शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांवर लग्न असताना मुलगी निघून गेली, खचलेल्या पित्याने जीवनयात्रा संपवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:28 IST

'मुलीला घरात घेऊ नका; मुलाचे लग्न व्यवस्थित करा' असे सुसाईड नोटमध्ये लिहून केली आत्महत्या. 

औरंगाबाद : मुलीचे हात १९ नोव्हेंबर रोजी पिवळे होणार असताना त्यापूर्वीच मुलगी घरातून निघून गेल्यामुळे खचलेल्या पित्याने मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री आठ वाजता संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली. संजय सांडूजी वाकेकर (४५, रा. महुनगर, सातारा परिसर) असे या पित्याचे नाव आहे.

संजय वाकेकर हे खासगी गाडीवर चालक आहेत. त्यांची पत्नी संगीता धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा कंपनीत नोकरी करतो. मुलगी घरीच होती. मुलीचे नात्यातील एका मुलासोबत नुकतेच लग्न जमवले होते. लग्नाची तारीखही काढण्यात आली. या लग्नाची जोरदार तयारी घरात चालली होती. डीजे, मंगल कार्यालयापासून सगळ्या गोष्टींचे बुकिंग केले होते. त्यासाठी दीड लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. सर्व कुटुंबासह नातेवाईक लग्नाच्या तयारी व्यस्त असताना मुलगी शनिवारी दुपारी ३ वाजता घरातून निघून गेली. या प्रकरणाची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. मुलीचा शोध घेण्यासाठी संजय वाकेकर यांनी परिसर पालथा घातला. मात्र, ती सापडली नाही. 

ऐनवेळी मुलीचे लग्न रद्द करावे लागेल, समाजात मोठी बदनामी होईल या भीतीने खचलेल्या संजय यांनी चिकलठाण्याकडून आलेल्या मालगाडी रेल्वेसमोर आत्महत्या केली. ते गाडीसमोर जात असताना परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकले नाही. रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी जवाहनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती कळवली. पोलिसांनी संजय यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. रविवारी सकाळी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास अंमलदार सुदाम दाभाडे करत आहेत.

चिठ्ठी लिहून पत्नीला सादसंजय वाकेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी 'प्रिय संगीता, मी हे जग सोडून जात आहे. आता मुलीला आता घरात घेऊ नका. मुलाचे लग्न व्यवस्थित करा. तुझी कायम आठवण राहील', असा मजूकर लिहिला आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांनी ही माहिती दिली.

यापूर्वीही गेली होती निघूनसंजय यांची मुलगी यापूर्वीही घरातून निघून गेली होती. सातारा पोलिसांनी तिचा शोध घेऊन परत आणले होते. तिच्या संमतीनेच चांगल्या मुलाशी लग्न जमविण्यात आले. तरीही तिने लग्न पाच दिवसांवर आलेले असताना घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती पत्नीला रविवारी दुपारी देण्यात आली, तेव्हा त्यांना मानसिक धक्का बसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी