शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर

By विकास राऊत | Updated: October 4, 2023 12:48 IST

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाईपोटी निधी जाहीर केला. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न करू शकलेले १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा तालुक्यात सुमारे एक हजारपर्यंत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले पीकही वाया गेले. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाने मराठवाड्यासाठी २ हजार ७०० कोटींची मदत दिली. यात जिल्ह्याला ४०० कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली; मात्र त्यानंतरची मदत ऑनलाइन खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खातेनिहाय याद्या अपलोड करून त्या तहसीलदारांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रमाणित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते ई-केवायसी, आधार लिंक करणे गरजेचे होते.

ई-केवायसीमुळे मदत जमा झाली नसेल...सततच्या पावसाची मदत जास्त होती. शासनाच्या सूचनेप्रमाणे खालील स्तरावरून नियमित झालेल्या यादीला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालयातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली. जिल्ह्यात १२ ते १५ हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त जणांच्या खात्यावर मदत गेलेली नसेल. सामायिक खाते, जमिनीचा वाद या व इतर कारणांमुळे ई-केवायसीच्या अडचणी आल्या असतील. त्यामुळे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल.-- जनार्दन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी