शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर

By विकास राऊत | Updated: October 4, 2023 12:48 IST

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाईपोटी निधी जाहीर केला. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न करू शकलेले १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा तालुक्यात सुमारे एक हजारपर्यंत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले पीकही वाया गेले. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाने मराठवाड्यासाठी २ हजार ७०० कोटींची मदत दिली. यात जिल्ह्याला ४०० कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली; मात्र त्यानंतरची मदत ऑनलाइन खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खातेनिहाय याद्या अपलोड करून त्या तहसीलदारांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रमाणित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते ई-केवायसी, आधार लिंक करणे गरजेचे होते.

ई-केवायसीमुळे मदत जमा झाली नसेल...सततच्या पावसाची मदत जास्त होती. शासनाच्या सूचनेप्रमाणे खालील स्तरावरून नियमित झालेल्या यादीला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालयातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली. जिल्ह्यात १२ ते १५ हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त जणांच्या खात्यावर मदत गेलेली नसेल. सामायिक खाते, जमिनीचा वाद या व इतर कारणांमुळे ई-केवायसीच्या अडचणी आल्या असतील. त्यामुळे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल.-- जनार्दन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी