शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर

By विकास राऊत | Updated: October 4, 2023 12:48 IST

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाईपोटी निधी जाहीर केला. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न करू शकलेले १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा तालुक्यात सुमारे एक हजारपर्यंत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले पीकही वाया गेले. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाने मराठवाड्यासाठी २ हजार ७०० कोटींची मदत दिली. यात जिल्ह्याला ४०० कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली; मात्र त्यानंतरची मदत ऑनलाइन खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खातेनिहाय याद्या अपलोड करून त्या तहसीलदारांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रमाणित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते ई-केवायसी, आधार लिंक करणे गरजेचे होते.

ई-केवायसीमुळे मदत जमा झाली नसेल...सततच्या पावसाची मदत जास्त होती. शासनाच्या सूचनेप्रमाणे खालील स्तरावरून नियमित झालेल्या यादीला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालयातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली. जिल्ह्यात १२ ते १५ हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त जणांच्या खात्यावर मदत गेलेली नसेल. सामायिक खाते, जमिनीचा वाद या व इतर कारणांमुळे ई-केवायसीच्या अडचणी आल्या असतील. त्यामुळे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल.-- जनार्दन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी