कंधार-लोह्यातील पुढार्यांची अग्नीपरीक्षा
By Admin | Updated: May 21, 2014 00:48 IST2014-05-21T00:32:28+5:302014-05-21T00:48:00+5:30
गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़

कंधार-लोह्यातील पुढार्यांची अग्नीपरीक्षा
गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़ त्यामुळे काँग्रेस-राकाँमधील मातब्बर पुढार्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे़ परंतु भाजपाला आशेची पालवी फुटेल असा उत्साह संचारला आहे़ उमेदवारीचे अडथळे पार करून कोण बाजी मारणार यावर राजकीय चर्र्चेने उधाण आणले आहे़ कंधार-लोहा हा तसा विरोधी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो़ भाई केशवराव धोंडगे यांनी या भागाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले़ तरीही गावपातळीपर्यंत काँग्रेस मजबूत स्थितीत राहत आली़ काँग्रेसचे कैग़ोविंदराव मोरे व ईश्वरराव भोसीकर यांना विधानसभेची संधी मिळाली होती़ गुरुनाथराव कुरूडे, प्रतापराव पा़ चिखलीकर यांना प्रत्येकी एक वेळा संधी मिळाली़ तर रोहिदास चव्हाण यांना दोन वेळा संधी मिळाली़ २००९ मध्ये अशोकराव चव्हाण यांनी अत्यंत राजकीय डावपेचाने शंकरअण्णा धोंडगे यांच्यासाठी प्रतिष्ठा वापरली़ काँग्रेसच्या हक्काची विधानसभा राक़ाँ़ला गेल्याने पक्षात मरगळ आली़ २००४ साली विधानसभेत काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले चिखलीकर यांची राजकीय कोंडी झाली़ अशोकराव चव्हाण यांच्याशी घेतलेला राजकीय पंगा काँग्रेस उमेदवारी शेकडो मैल दूर घेवून गेली़ चिखलीकर विरोधात सर्वांची एकजुट झाली़ यासाठी राजकीय व्युहरचना अशोकरावांनी केली़ त्याला यश आले़ परंतु काँग्रेस पक्ष दुबळा झाला़ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष मजबूत होण्याकडे अधिक लक्ष दिले़ कंधार-लोह्यातील ऩप़ निवडणुकीत चिखलीकर विरोधात सर्व पुढारी एकत्रित आले़ परंतु चिखलीकरांना कंधार ऩप़मध्ये रोखण्यात अपयश आले़ लोह्यात मात्र चिखलीकराचा मनोरथ रोखण्यात आला़ हे शहकाटशहाचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीपुरते मर्यादित झाले़ २००४ साली लातूर लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार आवळे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा चिखलीकर यांच्याकडे होती़ त्यामुळे पुन्हा चिखलीकर विरोध झाला़ काँग्रेसच्या मोजक्या नेत्या-कार्यकर्त्याचा अपवाद वगळता काँग्रेस-राकाँने भाजपा उमेदवाराचा छुपा प्रचार केला़ त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघात भाजपाला १७ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली़ लातूर व लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघाच्या आघाडीमुळे आवळे निवडून आले़ २००९ ची लोकसभा निवडणूक नमोविरूद्ध काँग्रेस-राकाँ आघाडी अशीच झाली़ त्यात पुन्हा आघाडी धर्म कागदावर पाळण्यात आला़ परंतु मनोमिलन हे काँग्रेस-राकाँचे झाले नाही़ शेकापने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपा उमेदवाराची प्रचार यंत्रणा अॅड़मुक्तेश्वर धोंडगे यांनी हाती घेतली़ मोदीमय वातावरण आणि त्याचे मतात रुपांतर करण्यासाठी अॅड़धोंडगे यांनी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरूषोत्तम धोंडगे, बाबूराव कागणे, धोंडिबा भायेगावे, भानुदास गीते, वारकड गुरूजी, उत्तम चव्हाण, शरद मुंडे, गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुसळे आदींची साथ घेतली़ लोहा विधानसभा निवडणुकीला ५-६ महिन्याचा अवधी आहे़ परंतु लोकसभा निवडणुकीवरून मताच्या बेरीज-वजाबाकीची आकडेमोड मात्र जोरात चालू असून विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना मोठी राजकीय मशागत करावी लागणार आहे़ त्यातच चिखलीकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शंकरअण्णांच्या उमेदवारीला मोठा अडथळा येणार आहे़ सिंचनाची कामे करण्यावर भर दिला जात असताना ग्रामीण भागातील भाजपाला झालेले मतदान ही मोठी समस्या झाली आहे़ लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहा विधानसभा मतदारसंघाची आघाडी नेत्रदीपक आहे़ भाजपा उमेदवाराला ९५ हजार २४९ तर काँगे्रसचे बनसोडे गुरूजी यांना ३६ हजार ९३३ मते मिळाली़ मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपाला तिप्पट मतांची आघाडी लोह्याने दिली़