३३ टक्क्यांवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण

By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:19:14+5:302015-04-28T00:30:29+5:30

बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले

Finishing up to 33% panchnama process | ३३ टक्क्यांवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण

३३ टक्क्यांवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण


बाळासाहेब जाधव ,लातूर
जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ आठवडाभरात ३३ टक्क्यांवरील नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होऊन याबाबतचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत़ परंतू राज्य सचिवांच्या आदेशामुळे उर्वरित २० व ३० टक्क्यावरील नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ तहसील कार्यालयावर आली आहे़
गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लातूर तालुक्यातील ६४ गावांतील ४०४ हेक्टर्स फळबाग क्षेत्र, ३७५ भाजीपाला क्षेत्र व ५७५ धान्य पिकांचे क्षेत्र असे एकूण १३५४ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील १३५ गावांतील १९५ हेक्टर्स फळबागा, १५२ हेक्टर्स भाजीपाला, १७५ हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण ५२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्याने ३३.३० हेक्टर्सवरील आंब्याच्या बागांचे नुकसान झाले रेणापूर तालुक्यातील ५६ गावांतील ६०.८० हेक्टर्स फळबागा, २२ हेक्टर्स भाजीपाला, १४० हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण २२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. देवणीतील ३८ गावांतील ९५ हेक्टर्सवरील फळबागा, २८ हेक्टर्सवरील भाजीपाला, ७ हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण १८३ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. जळकोट मधील २५ गावांतील २० हेक्टर्सवरील फळबागा, ५० हेक्टर्सवरील भाजीपाला, ४० हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण ११० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदपूर येथील ७९ गावांतील २२१.४५ हेक्टर्सवरील फळबागा, ६३.६० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २८५.०५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. औश्यातील ६३ गावांतील ३५० हेक्टर्सवरील फळबागा, १२६.७० हेक्टर्सवरील भाजीपाला, १०.६० हेक्टर्सवरील धान्य पिके असे एकूण ४८७.३० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. उदगीरमधील २५ गावांतील ५५ हेक्टर्सवरील फळबागा, २० हेक्टर्स वरील भाजीपाला अशा एकूण ७५ हेक्टर्सवर नुकसान आहे. चाकूरमधील ५२ गावांतील २५४ हेक्टर्स फळबागा, १८ हेक्टर्सवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील ३३ हेक्टरसह जिल्ह्यातील ३५४४ हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़

Web Title: Finishing up to 33% panchnama process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.