शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

१५ दुरुस्त्यांसह महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:35 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग आराखड्यावर ३२४ नागरिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामध्ये १५ प्रमुख दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अंतिम आराखडा आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मनपाच्या निवडणूक विभागाने दिली.

महापालिका निवडणुकीसाठी १२६ वॉर्डांचे ४२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व हद्दींचा नकाशा २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १६ जूनपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात आल्या. २२ जून रोजी औरंगाबादेत मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीसाठी नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी ३२४ आक्षेपांची सुनावणी घेतली. प्रभागांच्या हद्दींची स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देश हर्डीकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. दोनच प्रभागांच्या हद्दींबद्दल तसे आक्षेप होते. त्यामुळे त्या प्रभागांची तर स्थळ पाहणी करण्यात आलीच; पण त्याचबरोबर सर्व प्रभागांच्या हद्दी स्थळ पाहणी करून तपासून घेण्यात आल्या. काही चुका तर झालेल्या नाहीत ना, याची खातरजमा करण्यात आली आणि त्याचा अहवाल हर्डीकर यांना सादर करण्यात आला. हर्डीकर यांनी प्रभाग आराखड्यात एकूण १५ दुरुस्त्या सुचविल्या. त्यानुसार मनपाच्या निवडणूक विभागाने दुरुस्त्या करूनही दिल्या. आता हा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. यंदा मनपा निवडणूक प्रभागाच्या अनुषंगाने होत असल्याने प्रत्येक प्रभागासाठी एकच मतदार यादी तयार करावी लागणार आहे. यामध्ये मनपाच्या निवडणूक विभागाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. एका प्रभागाचे मतदार दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Municipal corporation Electionऔरंगाबाद महानगरपालिका निवडणुक 2022