शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

फेरविचार याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:52 PM

नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. यामुळे अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले असून, या संदर्भात नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रांजणगावातील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील गायरान व महार हातोळा जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शेख सिकंदर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले. यासाठी ग्रामपंचायतीला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात लवकरच अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीमार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येतात. यापोटी ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांकडून कराची वसुलीही करीत आहे. आता न्यायालयाने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले आहे.

या प्रकरणी लवकरच नागरिकांच्यावतीने उच्च न्यायालयात फेर-विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी २९ मार्च रोजी रांजणगावातील देवगिरी कॉलनीत सायंकाळी ७ वाजता बैठक घेण्यात येत आहे. यात विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून, बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास हिवाळे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंके, जावेद शेख आदींनी केले आहे.--------------------------

टॅग्स :Walujवाळूज