शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

महिला महापौरांनी पालटले इंदौर शहराचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:01 IST

औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

औरंगाबाद :  इंदौर शहर तीन-चार वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या स्पर्धेत कितीतरी क्रमांकाने मागे होते. त्याला देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आणणे सोपे नव्हते. या शहराच्या महापौर एक महिला असून, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. नागरिकांच्या सहभागाने या शहराने देशात पहिल्या क्रमांकाचा मान मिळविला. औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे इरकॉन परिषद घेण्यात आली. या परिषदेनिमित्त डॉ. पाल औरंगाबादेत आले होते. यावेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. औरंगाबादेत फार काही पाहता आले नाही. परंतु गाडीतून पाहताना रस्त्यावर पडलेला कचरा नजरेस पडला. औरंगाबादपेक्षा मुंबईत अधिक स्वच्छता दिसल्याचे डॉ. पाल म्हणाले. इंदौर येथील महापालिका, सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने स्वच्छतेत बदल घडला.  स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका प्रशासन अधिक दक्षता घेते. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्‍यांची संख्या महत्त्वाची ठरते. त्यांच्यावरच सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे पुरेसे सफाई कर्मचारी आहेत. रात्रीच्या वेळी रस्ते पाण्याने अक्षरश: धुऊन काढले जातात. इंदौरमध्ये नुकतेच नव्याने एक हजार स्वच्छतागृह उभारण्यात आल्याचे डॉ. पाल यांनी सांगितले.

शहरातील प्रत्येक घराघरांतून कचर्‍याचे संकलन केले जाते. कचरा संकलन करताना ओला-सुका असा वेगवेगळा गोळा केला जातो. वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रशिक्षणही देण्यात आले. कचर्‍यामुळे होणार्‍या साथीच्या आजारांचा धोकाही लक्षात आणून देण्यात आला. त्यामुळे घराघरांतून महिला वर्ग कचरा ओला-सुका असे वर्गीकरण करूनच देतात. गोळा झालेल्या कचर्‍याचेही वर्गीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र आहेत. ओल्या कचर्‍यापासून खत तयार करण्यात येतो. शहरातील उद्यानातही कचर्‍यापासून खत तयार होतो. हे खत त्याच उद्यानात वापरण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी स्पर्धागतवर्षी इंदौरने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळविला. मागच्या तुलनेत यंदा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. परंतु भोपाळ शहरही स्वच्छतेसाठी चांगली स्पर्धा करीत आहे. स्वच्छतेसाठी स्पर्धा होणे ही चांगली बाब आहे. इंदौर येथे अनेक शहरांतील नागरिक महापालिका पाहण्यासाठी येतात. औरंगाबाद महापालिकेनेही एकदा येऊन जायला हवे. इंदौरने कसा बदल घडविला हे नक्की पाहावे, असे डॉ. जी. पी. पाल म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान