शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला महापौरांनी पालटले इंदौर शहराचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:01 IST

औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

औरंगाबाद :  इंदौर शहर तीन-चार वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या स्पर्धेत कितीतरी क्रमांकाने मागे होते. त्याला देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आणणे सोपे नव्हते. या शहराच्या महापौर एक महिला असून, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. नागरिकांच्या सहभागाने या शहराने देशात पहिल्या क्रमांकाचा मान मिळविला. औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका  प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला  इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे इरकॉन परिषद घेण्यात आली. या परिषदेनिमित्त डॉ. पाल औरंगाबादेत आले होते. यावेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. औरंगाबादेत फार काही पाहता आले नाही. परंतु गाडीतून पाहताना रस्त्यावर पडलेला कचरा नजरेस पडला. औरंगाबादपेक्षा मुंबईत अधिक स्वच्छता दिसल्याचे डॉ. पाल म्हणाले. इंदौर येथील महापालिका, सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने स्वच्छतेत बदल घडला.  स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका प्रशासन अधिक दक्षता घेते. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्‍यांची संख्या महत्त्वाची ठरते. त्यांच्यावरच सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे पुरेसे सफाई कर्मचारी आहेत. रात्रीच्या वेळी रस्ते पाण्याने अक्षरश: धुऊन काढले जातात. इंदौरमध्ये नुकतेच नव्याने एक हजार स्वच्छतागृह उभारण्यात आल्याचे डॉ. पाल यांनी सांगितले.

शहरातील प्रत्येक घराघरांतून कचर्‍याचे संकलन केले जाते. कचरा संकलन करताना ओला-सुका असा वेगवेगळा गोळा केला जातो. वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रशिक्षणही देण्यात आले. कचर्‍यामुळे होणार्‍या साथीच्या आजारांचा धोकाही लक्षात आणून देण्यात आला. त्यामुळे घराघरांतून महिला वर्ग कचरा ओला-सुका असे वर्गीकरण करूनच देतात. गोळा झालेल्या कचर्‍याचेही वर्गीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्र आहेत. ओल्या कचर्‍यापासून खत तयार करण्यात येतो. शहरातील उद्यानातही कचर्‍यापासून खत तयार होतो. हे खत त्याच उद्यानात वापरण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी स्पर्धागतवर्षी इंदौरने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळविला. मागच्या तुलनेत यंदा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. परंतु भोपाळ शहरही स्वच्छतेसाठी चांगली स्पर्धा करीत आहे. स्वच्छतेसाठी स्पर्धा होणे ही चांगली बाब आहे. इंदौर येथे अनेक शहरांतील नागरिक महापालिका पाहण्यासाठी येतात. औरंगाबाद महापालिकेनेही एकदा येऊन जायला हवे. इंदौरने कसा बदल घडविला हे नक्की पाहावे, असे डॉ. जी. पी. पाल म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान