शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 3, 2015 00:29 IST

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने २०० फुटांपर्यंत पाणी लागेल याचा भरोसा नाही़ परिणामी बोअर पाडल्यास पैसे वाया जाण्याची भीती मनपाला भेडसावत आहे़ खास बाब म्हणून लातूर शहरात ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शंभर बोअर पाडण्याचे नियोजन केले आहे़ तसेच प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात पाणीपुरवठा योजनांसाठी ५ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे़ प्रभाग समितीला प्रत्येकी २५ लाख रुपये पाणीपुरवठा उपाययोजनांसाठी मंजुरी दिली आहे़ स्थायीचे शंभर आणि प्रभाग समित्यांचे व नगरसेवकांचे मिळून बोअर पाडण्याचा आकडा दोन-अडीचशेच्या पुढे जाऊ शकतो़ परंतु, भूजल विभागाकडून २०० फुटापर्यंतच बोअर पाडण्यास परवानगी आहे़ मागचा अनुभव पाहता २०० फुटांवर लातूर शहरात पाणी लागत नाही़ जर दोन-अडीचशे बोअर घेतली तर पैसे वाया जातील, अशी भीती नगरसेवकांसह मनपा प्रशासनाला आहे़ स्थायी समितीने शंभर बोअरसह प्रति ५ लाख आणि चार प्रभाग समित्यांना प्रत्येकी २५ लाख असा मोठा निधी मंजूर केला आहे़ हा सगळा पैसा बोअर पाडण्यास खर्ची केला तर पाणी लागेल का, असा प्रश्न आहे़ ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी दिली तर पाणी लागण्याची आशा आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास खास बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी कालच केली आहे़ (प्रतिनिधी)लातूर शहराला दरदिवसाला ३़५ कोटी लिटर्स पाणी लागते़ सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात पाणीसाठा नाही़ त्यामुळे या प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी नगरसेवक स्वत:च्या विकास फंडातून बोअर पाडू इच्छित आहेत़ तसेच स्थायी समितीनेही शंभर बोअर पाडण्यास परवानगी दिली आहे़ प्रभाग समितीलाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे़ जवळपास २०० ते २५० बोअर शहरात घेण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली़ ४गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे़ पाणीसाठे कोरडे पडले असून, जमिनीतील पाणीपातळीची घट झाली आहे़ २०० फुटांवर तर कोठेच पाणी नाही़ त्यामुळे ४०० फुट खोल बोअर पाडण्याचा विचार बोलून दाखविला आहे़ त्यावर शासन सकारात्मक निर्णय देईल, अशी आपेक्षा राजा मणियार आणि यांनी व्यक्त केली़