शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 3, 2015 00:29 IST

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने २०० फुटांपर्यंत पाणी लागेल याचा भरोसा नाही़ परिणामी बोअर पाडल्यास पैसे वाया जाण्याची भीती मनपाला भेडसावत आहे़ खास बाब म्हणून लातूर शहरात ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शंभर बोअर पाडण्याचे नियोजन केले आहे़ तसेच प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात पाणीपुरवठा योजनांसाठी ५ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे़ प्रभाग समितीला प्रत्येकी २५ लाख रुपये पाणीपुरवठा उपाययोजनांसाठी मंजुरी दिली आहे़ स्थायीचे शंभर आणि प्रभाग समित्यांचे व नगरसेवकांचे मिळून बोअर पाडण्याचा आकडा दोन-अडीचशेच्या पुढे जाऊ शकतो़ परंतु, भूजल विभागाकडून २०० फुटापर्यंतच बोअर पाडण्यास परवानगी आहे़ मागचा अनुभव पाहता २०० फुटांवर लातूर शहरात पाणी लागत नाही़ जर दोन-अडीचशे बोअर घेतली तर पैसे वाया जातील, अशी भीती नगरसेवकांसह मनपा प्रशासनाला आहे़ स्थायी समितीने शंभर बोअरसह प्रति ५ लाख आणि चार प्रभाग समित्यांना प्रत्येकी २५ लाख असा मोठा निधी मंजूर केला आहे़ हा सगळा पैसा बोअर पाडण्यास खर्ची केला तर पाणी लागेल का, असा प्रश्न आहे़ ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी दिली तर पाणी लागण्याची आशा आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास खास बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी कालच केली आहे़ (प्रतिनिधी)लातूर शहराला दरदिवसाला ३़५ कोटी लिटर्स पाणी लागते़ सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात पाणीसाठा नाही़ त्यामुळे या प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी नगरसेवक स्वत:च्या विकास फंडातून बोअर पाडू इच्छित आहेत़ तसेच स्थायी समितीनेही शंभर बोअर पाडण्यास परवानगी दिली आहे़ प्रभाग समितीलाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे़ जवळपास २०० ते २५० बोअर शहरात घेण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली़ ४गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे़ पाणीसाठे कोरडे पडले असून, जमिनीतील पाणीपातळीची घट झाली आहे़ २०० फुटांवर तर कोठेच पाणी नाही़ त्यामुळे ४०० फुट खोल बोअर पाडण्याचा विचार बोलून दाखविला आहे़ त्यावर शासन सकारात्मक निर्णय देईल, अशी आपेक्षा राजा मणियार आणि यांनी व्यक्त केली़