कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती

By Admin | Updated: September 3, 2015 00:29 IST2015-09-03T00:25:14+5:302015-09-03T00:29:42+5:30

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने

Fears of wastage of capsule money | कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती

कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती


लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने २०० फुटांपर्यंत पाणी लागेल याचा भरोसा नाही़ परिणामी बोअर पाडल्यास पैसे वाया जाण्याची भीती मनपाला भेडसावत आहे़ खास बाब म्हणून लातूर शहरात ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शंभर बोअर पाडण्याचे नियोजन केले आहे़ तसेच प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात पाणीपुरवठा योजनांसाठी ५ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे़ प्रभाग समितीला प्रत्येकी २५ लाख रुपये पाणीपुरवठा उपाययोजनांसाठी मंजुरी दिली आहे़ स्थायीचे शंभर आणि प्रभाग समित्यांचे व नगरसेवकांचे मिळून बोअर पाडण्याचा आकडा दोन-अडीचशेच्या पुढे जाऊ शकतो़ परंतु, भूजल विभागाकडून २०० फुटापर्यंतच बोअर पाडण्यास परवानगी आहे़ मागचा अनुभव पाहता २०० फुटांवर लातूर शहरात पाणी लागत नाही़ जर दोन-अडीचशे बोअर घेतली तर पैसे वाया जातील, अशी भीती नगरसेवकांसह मनपा प्रशासनाला आहे़ स्थायी समितीने शंभर बोअरसह प्रति ५ लाख आणि चार प्रभाग समित्यांना प्रत्येकी २५ लाख असा मोठा निधी मंजूर केला आहे़ हा सगळा पैसा बोअर पाडण्यास खर्ची केला तर पाणी लागेल का, असा प्रश्न आहे़ ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी दिली तर पाणी लागण्याची आशा आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास खास बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी कालच केली आहे़ (प्रतिनिधी)
लातूर शहराला दरदिवसाला ३़५ कोटी लिटर्स पाणी लागते़ सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात पाणीसाठा नाही़ त्यामुळे या प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी नगरसेवक स्वत:च्या विकास फंडातून बोअर पाडू इच्छित आहेत़ तसेच स्थायी समितीनेही शंभर बोअर पाडण्यास परवानगी दिली आहे़ प्रभाग समितीलाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे़ जवळपास २०० ते २५० बोअर शहरात घेण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली़
४गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे़ पाणीसाठे कोरडे पडले असून, जमिनीतील पाणीपातळीची घट झाली आहे़ २०० फुटांवर तर कोठेच पाणी नाही़ त्यामुळे ४०० फुट खोल बोअर पाडण्याचा विचार बोलून दाखविला आहे़ त्यावर शासन सकारात्मक निर्णय देईल, अशी आपेक्षा राजा मणियार आणि यांनी व्यक्त केली़

Web Title: Fears of wastage of capsule money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.