शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांना चिंता

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत. पाऊसच नाही पडला तर या अनामिक भितीने शेतकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याने शेतकऱ्यांनी आनंदात पेरणी उरकून घेतली. त्यानंतर थोड्याफार आलेल्या रिमझिम पावसाने बिजे अंकुरली. मात्र आज उद्या येईल, या आशेवर शेतकरी असतानाच पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांची आशा सोडून पिकांवर नांगर फिरवला आहे.दिंद्रूडसह पंचक्रोशीतील चाटगाव, संगम, देवदहिफळ, जवळा, नाकलगाव, पिंपळगाव, आलापूर, बेलुरा, शिंदेवाडी, चोपनवाडी, खाडेवाडी आदी गावातील कापूस, तूर, तीळ, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके जळून जात आहेत. खरीप तर १०० टक्के हातचे गेले आहे. मात्र पाऊस नाही पडला तर रबीचे काय होईल? अशी अनामिक भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनासाठी लागणारी वैरण संपत आली आहे तर काही शेतकऱ्यांना काय खायला घालावे ही पंचाईत पडली आहे. मात्र गोवंश हत्याबंदी कायदा करणारे सत्ताधारी जनावरांच्या चारा, पाण्यासाठी काहीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर काय करावे? या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. तसेच विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरबंद पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी आणायचे कोठून? या विवंचनेत असलेले शेतकरी वरुणराजाची कृपा कधी होतेय, या आशेवर जगत आहे. (वार्ताहर)