शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

By मुजीब देवणीकर | Updated: March 9, 2023 13:27 IST

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील पंपहाउसमध्ये सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. होळीच्या दिवशीही नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा विभागाने काही भागात उशिराने, तर काही वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला.

सोमवारी रात्री ९ वाजता आणि रात्री ११ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे फारोळा येथील विजेच्या सबस्टेशनमध्ये अचानक स्पार्किंग होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीनंतर पहाटे साडेतीन वाजता पाणीपुरवठा पूर्ववत झाला. साडेसहा तास पाणीपुरवठा बंद असल्याने, मंगळवारी होळीच्या दिवशी नागरिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. धुलिवंदनाच्या दिवशी अनेक वसाहतींना पाणी मिळाले नाही. त्यातच मंगळवारी दुपारी पुन्हा १२.४५ वाहता फारोळ्यातच विद्युत पुरवठा खंडित झाला. मे.चैतन्य इलेक्ट्रिकल या एजन्सीमार्फत नवीन पॅनल बसविण्यात आले. या कामासाठी ११ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. या ११ तासात लिकेज दुरुस्तीचे काम मे.ट्रान्सडेल्टा कंपनीमार्फत करण्यात आले. त्यानंतर, मध्यरात्रीपासून पम्पिंग पूर्ववत करण्यात आली.

जलकुंभ रिकामेफारोळा येथील पम्पिंग सुरू केल्यानंतर बुधवारी पहाटे ४ वाजता जलकुंभात पाणी आले. ज्या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागाला बुधवारी दुपारनंतर पाणी दिले. अनेक वसाहतींना पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी