शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञान आणि मिश्र शेतीतून शेतकरी समृद्ध होईल: डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:13 IST

भारतीय शेतीचे आधुनिकीकरण करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो: डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर: भारतीय शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पशुपालनासह मिश्र शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. ते आज, शनिवारी (दि. २३) छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात पशुवैद्यक शास्त्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवाण यांनी संस्थेच्या प्रवासाची माहिती दिली. संस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीत झाली असली तरी, आज अनेक सहकाऱ्यांच्या योगदानाने संस्थेची क्षमता वाढली आहे, असे ते म्हणाले.

पुरस्कार देऊन यांना केले सन्मानित यावेळी पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पशुपालक आणि पशुवैद्यकीय पदवीधरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये आदर्श पशुपालक पुरस्कार (सौ. वैशाली चव्हाण), आदर्श गोपालक (रामकृष्ण दरगुडे), आदर्श शेळीपालक (राहुल पुऱ्हे), गुणवंत विद्यार्थी (डॉ. कु. ईश्वरी जोशी), यशवंत विद्यार्थी सुवर्ण पदक (डॉ. वैभव हरडे), गुणवंत विद्यार्थिनी (डॉ. कु. शारदा ढाकरके) यांचा समावेश होता.याशिवाय, आदर्श पशुवैद्य (डॉ. अनिल कौसडीकर), पशुवैद्य भूषण (डॉ. नरेश गीते), जीवनगौरव पुरस्कार (डॉ. अरविंद मुळे), आदर्श प्राध्यापक (डॉ. प्रफुल्लकुमार पाटील), उत्कृष्ट पशुवैद्य सहदेव पुरस्कार (डॉ. आनंद दडके), उत्कृष्ट पशुवैद्य नकुल पुरस्कार (डॉ. विजय ढोके), उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार (डॉ. प्रमोद दोशी) आणि आदर्श प्राध्यापक (डॉ. विश्वंभर पाटोदकर) यांनाही गौरवण्यात आले.

कृषी स्वयंपूर्णतेची गरजडॉ. भागवत पुढे म्हणाले, "आपल्याकडे न बोलणाऱ्या प्राण्यांचे दुःख समजून त्यांना बरे करण्याची कला आहे. शालिहोत्र या प्राचीन पशुवैद्याने घोड्याचे वय व गुणवत्तेचे शास्त्र सांगितले होते. आपली ही परंपरा अभिमानास्पद आहे. पाश्चात्त्य तंत्रज्ञान आवश्यक तेथे स्वीकारून भारतीय पद्धतीनुसार शेती आणि पशुपालनाचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचा लाभ होईल." ते म्हणाले की, देशी गोवंश आणि पारंपरिक शेती पद्धतीवर लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीचे आधुनिकीकरण करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMohan Bhagwatमोहन भागवत