शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 19:03 IST

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे ठिय्या आंदोलन: विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले लेखी आश्वासन          

छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी संततदार पाऊस आणि अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा कृषीअधीक्षक कार्यालयात ठिय्या देताच, कृषी अधीक्षक आणि विमा कंपनी प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसांत नुकसानभरपाई जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. 

यावर्षी अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. मुसळधार पाऊस न पडल्यामुळे नदी,नाले कोरडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण शेतकरी चिंतीत आहेत. गतवर्षी संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पिकाची अंती पैसेेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचा अंतिम पीक कापण अहवाल डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिला होता. याअहवालाच्या आधारे पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई देणे आवश्यक होते.मात्र अद्याप शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई दिली नव्हती. याप्रश्नावर माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी 2 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत  जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास ठिय्या दिल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधी पी.आर. कांबळे यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले.  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.

जिल्ह्यातील ६०टक्केच शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई का?डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ५० पैसेेपेक्षा कमी आहे. असे असताना प्रशासनाने एकूण पीक पेऱ्यांच्या ६० टक्केच क्षेत्रावरील पिकांना नुकसानभरपाई का देऊ केली, असा सवाल कृषी अधीक्षकांना केला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कृषी अधीक्षक यांना देता आले नाही. शेवटी त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे, याबाबतची कार्यवाही करण्याचे पत्रही कृषी अधीक्षकांनी जाधव यांना दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस