शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 19:03 IST

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे ठिय्या आंदोलन: विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले लेखी आश्वासन          

छत्रपती संभाजीनगर: गतवर्षी संततदार पाऊस आणि अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्याने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा कृषीअधीक्षक कार्यालयात ठिय्या देताच, कृषी अधीक्षक आणि विमा कंपनी प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसांत नुकसानभरपाई जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. 

यावर्षी अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. मुसळधार पाऊस न पडल्यामुळे नदी,नाले कोरडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण शेतकरी चिंतीत आहेत. गतवर्षी संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पिकाची अंती पैसेेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचा अंतिम पीक कापण अहवाल डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिला होता. याअहवालाच्या आधारे पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई देणे आवश्यक होते.मात्र अद्याप शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई दिली नव्हती. याप्रश्नावर माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी 2 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत  जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास ठिय्या दिल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधी पी.आर. कांबळे यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले.  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.

जिल्ह्यातील ६०टक्केच शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई का?डिसेंबर २०२२मध्ये प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ५० पैसेेपेक्षा कमी आहे. असे असताना प्रशासनाने एकूण पीक पेऱ्यांच्या ६० टक्केच क्षेत्रावरील पिकांना नुकसानभरपाई का देऊ केली, असा सवाल कृषी अधीक्षकांना केला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कृषी अधीक्षक यांना देता आले नाही. शेवटी त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे, याबाबतची कार्यवाही करण्याचे पत्रही कृषी अधीक्षकांनी जाधव यांना दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस