शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

By Admin | Updated: May 24, 2014 00:45 IST2014-05-24T00:29:11+5:302014-05-24T00:45:57+5:30

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे.

The farmers will be able to get electricity | शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे. मात्र यासाठी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत यादीतील कृषीपंपधारक शेतकर्‍यांनाच वीजबिलमाफीचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणच्या अधिकृत सूत्राकंडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून या कालावधीत वीज देयक शासन अदा करणार आहे़ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असून गारपीटग्रस्तांचे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज देयक माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ यासाठी शासनाने २०० कोटींची तरतूद केलेली आहे़ महूसल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील गारपीटग्रस्तांनाच वीजबीलमाफीचा फायदा मिळणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करण्यात येणार नाही. ज्या शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत कर्जाची परतफेड केली. अशा शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीक कर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसात पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ज्या बाधित शेतकर्‍यांनी ३० जून २०१४ पर्यंत पीककर्जाची परतफेड केल्यास अशा शेतकर्‍यांचे नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीककर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या कर्जाचे तीन वर्षांकरिता म्हणजेच सन २०१४-१५, २०१५-१६, १०१६-१७ या कालावधीकरिता शेती पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. आणि पुनर्गठनाचा पर्याय स्विकारलेल्या शेतकर्‍यांचे पुनर्गठनापूर्वीचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी पाठविलेल्या अधिकृत यादीतील शेतकर्‍यांनाच वीजबील माफीचा लाभ मिळेल. गारपिटीचे महसूल व कृषी विभागाद्वारे झालेल्या सर्वेक्षणानंतर अंतिम यादी तयार झाली आहे़ यामधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वीज देयक माफीचा लाभ मिळणार असून यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांना वीजदेयके माफीचा लाभ मिळणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्यात येणार नाही.

Web Title: The farmers will be able to get electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.