शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बोंड अळी बाधित कपाशीची नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:39 AM

बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.विशेष म्हणजे राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरू होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतकºयांच्या हातात बोंड अळी लागलेले कपाशीचे परदड होते. काही शेतकºयांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ अशा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले. प्रल्हाद पोकळेसोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासमोर संतापलेल्या शेतकºयांनी बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिकाºयांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनिटांतच पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतकºयांना शांत करण्यात अधिकाºयांना यश आले होते. कपाशीवरील बोंड अळी बाधित शेतकºयांच्या शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने संतोष जाधव यांनी मागणी केली. शेतकºयांचा संताप दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतकºयांच्या मागण्या मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले.येत्या आठवडाभरात पंचनामे होणारकपाशीवरील बोंड अळीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल.-प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालकतथा पालक संचालकहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावीजिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंड अळी पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.-संतोष जाधव, माजी सभापतीअर्थ व बांधकाम (जि. प.)शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार१० एकरात कपाशी लावली होती. अवघी १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षित होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारांपर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता, पण ४००० ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे. बोंड अळीने मोठे नुकसान झाले. कपाशीला भाव नाही. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार.-राजेंद्र चव्हाण,वजनापूर, ता. गंगापूर