शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

शेतकऱ्यांनी वनौषधीच्या शेतीकडे वळावे; त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:34 PM

शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

औरंगाबाद : आयुर्वेद व आयुष पॅथीवर संंशोधन करण्यासाठी जगातील १२ देशाशी करार झाला आहे. यामुळे येत्या काळात वनौषधीला मोठी मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज शहरात आले होते. नाईक यांनी पुढे सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) मध्ये गेल्या वर्षी भारताचा एक प्रतिनिधीचा समावेश झाला आहे. याद्वारे आयुर्वेद, आयुष व अन्य देशातील वैद्यकीय पॅथीचा संबंध यावर संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे योगापाठोपाठ आयुर्वेद, आयुषला जागतिक मान्यता मिळत आहे. देशातीलच नव्हे तर विदेशी कंपन्यानकडूनही आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढू लागली आहे.

मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु

वनौषधीचे उत्पादन वाढावे यासाठी मंत्रालयाने मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु केले असून त्याद्वारे वनौषधीची शेती करणाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, तसेच अर्थसाह्य केले जात आहे. यात खाजगी व स्वयंसेवी संस्था उतरल्या आहेत. विविध कंपन्यांशी करार करुन वनौषधीची शेती केली जात आहे. याचधर्तीवर पुण्याच्या आसपासच्या परिसरात अडीच हजार एकरवर वनौषधीची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक घेत असताना मधल्या ३ ते ६ महिन्याच्या काळात वनौषधीची शेती करावी, जेणे करुन उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. 

आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, जसे अ‍ॅलोपॅथीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सरकारच्या विविध योजना, सवलती देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांसाठीही सरकारी योजनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोेषणाही त्यांनी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmedicineऔषधं