शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शेतकऱ्यांनो लष्करी अळीवर वेळीच उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:18 IST

आठ दिवसांनंतर मका पिकाचे होईल ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

ठळक मुद्दे५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी कराबीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्यांनी ७ व ११ जून रोजी मक्याची लागवड केली त्यांच्या पिकावर लष्करी अळीने कब्जा केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत उपाययोजना केल्या नाहीत, तर मका पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 

जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील सवंदगाव, लोणी बु., औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबाद येथील गदाना, सालुखेडा, कन्नड येथील रिठ्ठी या गावांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या लोकमतने प्रसिद्ध केल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी वर्गात खळबळ  उडाली आहे. शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उदय चौधरी यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जि. प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते. 

चौधरी म्हणाले की, राज्यात सर्वाधिक मका उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. येथील १ लाख ८० हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड होते तर जालना जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मका लागवड होते. लागवड झाल्यापासून १० दिवसांच्या आत अमेरिकन लष्करी अळीची लागण होते. शेतकऱ्यांच्या हातात फक्त ८ दिवस असून, या काळात उपाययोजना केल्या नाही तर ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते. जर उपाययोजना केल्या तर ८० टक्के उत्पादन हातात येऊ शकते. जर काहीच उपाययोजना केल्या नाही तर लष्करी अळी पीक खाऊन टाकील व ३० ते ४० टक्के उत्पादन हाती येईल किंवा त्याचाही भरोसा नाही. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी तुकाराम मोटे यांनी सांगितले की, बीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही. पण त्यानंतर उपाययोजना केली नाही तर त्या पिकावरही लष्करी अळी हल्ला करू शकते. यामुळे बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यावरही उपाययोजना कराव्यात. आजघडीला फक्त ३५ टक्के बियाण्यावर बीज प्रक्रिया केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी कराकृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, मक्याची लागवड २२ जूनपासून सुरू झाली आहे. ५ जुलैपर्यंत संपूर्ण गावाने मक्याची लागवड आटोपून घ्यावी. त्यानंतर मक्याची उशिरा लागवड केल्यास त्यावर अळीचा जादा प्रादुर्भाव आढळून येईल. त्यामुळे ६ जुलैनंतर मक्याची लागवड करू नये. त्याऐवजी तूर, बाजरी इत्यादी पिकांचा विचार करावा. एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याचे होणारे नुकसान टाळता येईल. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र