शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

शेतकऱ्यांनो लष्करी अळीवर वेळीच उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:18 IST

आठ दिवसांनंतर मका पिकाचे होईल ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

ठळक मुद्दे५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी कराबीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्यांनी ७ व ११ जून रोजी मक्याची लागवड केली त्यांच्या पिकावर लष्करी अळीने कब्जा केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत उपाययोजना केल्या नाहीत, तर मका पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 

जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील सवंदगाव, लोणी बु., औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबाद येथील गदाना, सालुखेडा, कन्नड येथील रिठ्ठी या गावांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या लोकमतने प्रसिद्ध केल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी वर्गात खळबळ  उडाली आहे. शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उदय चौधरी यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जि. प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते. 

चौधरी म्हणाले की, राज्यात सर्वाधिक मका उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. येथील १ लाख ८० हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड होते तर जालना जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मका लागवड होते. लागवड झाल्यापासून १० दिवसांच्या आत अमेरिकन लष्करी अळीची लागण होते. शेतकऱ्यांच्या हातात फक्त ८ दिवस असून, या काळात उपाययोजना केल्या नाही तर ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते. जर उपाययोजना केल्या तर ८० टक्के उत्पादन हातात येऊ शकते. जर काहीच उपाययोजना केल्या नाही तर लष्करी अळी पीक खाऊन टाकील व ३० ते ४० टक्के उत्पादन हाती येईल किंवा त्याचाही भरोसा नाही. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी तुकाराम मोटे यांनी सांगितले की, बीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही. पण त्यानंतर उपाययोजना केली नाही तर त्या पिकावरही लष्करी अळी हल्ला करू शकते. यामुळे बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यावरही उपाययोजना कराव्यात. आजघडीला फक्त ३५ टक्के बियाण्यावर बीज प्रक्रिया केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी कराकृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, मक्याची लागवड २२ जूनपासून सुरू झाली आहे. ५ जुलैपर्यंत संपूर्ण गावाने मक्याची लागवड आटोपून घ्यावी. त्यानंतर मक्याची उशिरा लागवड केल्यास त्यावर अळीचा जादा प्रादुर्भाव आढळून येईल. त्यामुळे ६ जुलैनंतर मक्याची लागवड करू नये. त्याऐवजी तूर, बाजरी इत्यादी पिकांचा विचार करावा. एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याचे होणारे नुकसान टाळता येईल. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र