शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे-चव्हाण

By admin | Updated: August 26, 2015 00:47 IST

जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे

जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी जालन्यात केली.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरूण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आ. धोंडीराम राठोड, सुरेश जेथलिया, संतोषराव दसपुते, शंकरराव राख, शकुंतला शर्मा, कल्याण काळे, सेवा दलाचे विलास औताडे, आर.आर.खडके, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस विमलताई आगलावे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आयशा खान, डेव्हीड घुमारे प्रभाकर पवार , बाबूराव कुलकर्णी, रवींद्र तौर ज्ञानेश्वर पायगव्हाणे उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात भयावह स्थिती असून, सरकार मात्र झोपेचे सांग घेत आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे असते परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग कशी आणावी, असा सवाल करुन ते म्हणाले, की आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. निवडणूक काळात केवळ घोषणांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले आहे. सत्तेत आल्यानंतर सर्व घोषणा हवेतच विरल्या आहेत. सर्व आश्वासने कागदावरच असून, याची अमलबजावणी करण्याची भाजपा सरकारची कुठलीही मानसिकता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा याचा स्फोट होण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला. या सरकारला बहुमताचा पारा चढला असून, सरकारच्या कार्यपद्धतीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संकेत चव्हाण यांनी परिषदेत दिले. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, सध्याचे सरकार हे ढिम्म असून, सर्व पातळ्यांवर ते अपयशी ठरले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याचे सांगून बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनेच सभागृहात सरकारच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवला नसून सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही शेतकऱ्यांचा आवाज मांडला आहे. मात्र, तरीही सरकार जागचे हलायला तयारी नाही. राज्य करण्यासाठी ही मंडळी योग्य नसल्याचे सांगून सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे खा. चव्हाण म्हणाले. भीमराव डोंगरे म्हणाले की, बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, रोहिलागड येथील युनियन बँकेच्या अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याने केवळ ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असताना त्याच्या सातबाऱ्यावर चक्क एक लाख ३५ हजारांचे कर्जाचा बोझा चढविला. डोंगरे यांनी पुरावा म्हणून सातबाराच उपस्थितांना दाखविला. फळबागांचा पीकविमा शेतकऱ्यांना अद्याप न भेटल्याने त्यांनी सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तर केवळ राजकीय अकसापोटी जालन्यातील जलवाहिनी अंथरण्याचे १३० कोटी रुपये खर्चाचे मंजूर झालेले काम रद्द करण्यात आले. तसेच विद्यमान आमदार ३०० बंधारे उभारल्याचा दावा करीत असले तरी वखारी येथे एकच बंधारा उभारला असून, तोही आपल्या कार्यकाळातच झाल्याचा दावा माजी आ. गोरंट्याल यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक गणेश राऊत व धर्मा खिल्लारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रवींद्र तौर, डेव्हीड घुमारे, कल्याण काळे यांंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी २ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)