शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 7:01 PM

शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची कमी उंची अडचणीची ठरणार आहे.

हतनूर (औरंगाबाद ) : गतवर्षीच्या पिकविम्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्यात यावी या मागण्यांसाठी हतनूर, चिकलठाण व चापानेर परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. 

सध्या धुळे-औरंगाबाद राष्ट्रीय महा मार्ग क्र 52 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून हतनूर बसथांब्यावर उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्या उड्डाणपुलाची उंची साडे चार मीटर असल्याने ऊस कापसाच्या वाहनांसह परिसरातील शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची उंचीची अडचण ठरणार आहे. त्यासाठी प्रस्तावित पुलाची उंची वाढविण्यात यावी. तसेच कन्नड तालुक्यातील चिकलठाण चापानेर या महसूल मंडळात पिकविमा तात्काळ देण्यात यावा यासाठी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

प्रशासनातर्फे नायब तहसीलदार हारूण शेख यांनी माजी आ. जाधव व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आंदोलनकर्त्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र, जाधव व आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. अखेरीस जाधव यांच्यासह पंधरा आंदोलकांना पोलिसांनी अटक करून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात पं.स सभापती मीना मोकासे, पं स सदस्य किशोर पवार ,साहेबराव अकोलकर ,अशोक वाळुंजे , सिद्धेश्वर झालटे ,जयेश बोरसे ,कैलास अकोलकर, शिवकांत मोहिते आदींचा सहभाग होता. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, वाहतूक पोनि नामदेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोंबरे, बीट जमादार एस, बी ,चव्हाण यांनी पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.                   

टॅग्स :agitationआंदोलनhighwayमहामार्गFarmerशेतकरीHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव