शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 19:05 IST

शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची कमी उंची अडचणीची ठरणार आहे.

हतनूर (औरंगाबाद ) : गतवर्षीच्या पिकविम्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्यात यावी या मागण्यांसाठी हतनूर, चिकलठाण व चापानेर परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. 

सध्या धुळे-औरंगाबाद राष्ट्रीय महा मार्ग क्र 52 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून हतनूर बसथांब्यावर उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्या उड्डाणपुलाची उंची साडे चार मीटर असल्याने ऊस कापसाच्या वाहनांसह परिसरातील शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची उंचीची अडचण ठरणार आहे. त्यासाठी प्रस्तावित पुलाची उंची वाढविण्यात यावी. तसेच कन्नड तालुक्यातील चिकलठाण चापानेर या महसूल मंडळात पिकविमा तात्काळ देण्यात यावा यासाठी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

प्रशासनातर्फे नायब तहसीलदार हारूण शेख यांनी माजी आ. जाधव व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आंदोलनकर्त्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र, जाधव व आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. अखेरीस जाधव यांच्यासह पंधरा आंदोलकांना पोलिसांनी अटक करून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात पं.स सभापती मीना मोकासे, पं स सदस्य किशोर पवार ,साहेबराव अकोलकर ,अशोक वाळुंजे , सिद्धेश्वर झालटे ,जयेश बोरसे ,कैलास अकोलकर, शिवकांत मोहिते आदींचा सहभाग होता. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, वाहतूक पोनि नामदेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोंबरे, बीट जमादार एस, बी ,चव्हाण यांनी पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.                   

टॅग्स :agitationआंदोलनhighwayमहामार्गFarmerशेतकरीHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव