शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गावातील पाण्यावर शासनाचा डल्ला; अनुदानाने नव्हे, तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील: पी.साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:29 IST

आतापर्यंत सीमेवर लढलेल्या युद्धात जेवढी जीवित हानी झाली त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन संपविले आहे.

छत्रपती संभाजीनगर : १९९१ मध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून केंद्र सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी आहेत. शेती परवडत नसल्याने देशातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांनी शेतीशी नाते तोडले आहे. ग्रामीण भागातील पाण्यावर शासन डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या अनुदानाने नव्हे, तर पाण्याने सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी येथे केले.

नेशन फॉर फार्मर्सच्या वतीने रविवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात शेतकरी आत्महत्या, समस्या आणि उपाय या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राचे बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर, चर्चासत्राचे निमंत्रक तथा बॅकिंग कर्मचारी संघटनेचे नेते देविदास तुळजापूरकर, पत्रकार सुहास सरदेशमुख ,ॲड. विष्णू ढोबळे आणि रंजन दाणी उपस्थित होते. पी. साईनाथ म्हणाले की, बी.टी. बियाण्यांऐवजी स्थानिक बियाणे जास्त चांगले आहे. बीटी बियाणे अळीला रोखू शकत नाही, हे निष्पन्न झाले आहे. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या माथी बीटी बियाणेच मारते. २००१ मध्ये प्रति व्यक्ती ५१७७ घ.मी. पाणी उपलब्ध होते. २०२५ मध्ये केवळ ११४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या अधिक असताना त्यांच्यासाठी कोणतेही धोरण सरकारकडे नाही.

मुंबईतील बांद्र्यात ३५ वर्षांत एक दिवसही पाण्याचा खंड नाहीमुंबईतील बांद्र्यातील आपण रहिवासी आहोत. मागील ३५ वर्षांच्या काळात बांद्र्यात एक दिवसही नळाच्या पाण्याचा खंड नाही. हे पाणी ज्या आदिवासी भागातील पाच तलावांतून येते, त्या आदिवासींना मात्र नळाचे पाणी नसल्याचे पी. साईनाथ यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे शेतकऱ्यांविरोधात आर्थिक युद्धआतापर्यंत सीमेवर लढलेल्या युद्धात जेवढी जीवित हानी झाली त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन संपविले आहे. सरकारने शेतकऱ्यांविरोधात एकप्रकारे आर्थिक युद्धच पुकारले असल्याचा आरोप किसान नेता राजन क्षीरसागर यांनी केला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर