शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी भरला साडेसात लाख विमा

By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST

उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा संरक्षित केला आहे.

उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा संरक्षित केला आहे. सुमारे ७ लाख ४५ हजार ३९० शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपये पीक विम्यापोटी भरल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली असून, महाराष्ट्रात सर्वाधिक खरीप विमा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदाही उशिराने झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडीला ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. दरम्यान, निसर्गाच्या अवकृपेमुळे पिके हाती लागतील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक पिके संरक्षित करण्यासाठी शेतकरी पुढे आल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. उस्मानाबाद तालुक्यातून १ लाख ४१ हजार ५२९ शेतकऱ्यांनी ३ कोटी १९ लाख ९१ हजार रुपये विमा हप्ता भरून पिके संरक्षित केली आहेत. याशिवाय तुळजापूर तालुक्यातून १ लाख २२ हजार ९०० शेतकऱ्यांनी २ कोटी ३० लाख ३३ हजार रुपये, उमरगा तालुक्यातून १ लाख २२ हजार ९० शेतकऱ्यांनी २ कोटी ५७ लाख २७ हजार रुपये, लोहारा तालुक्यातून ५६ हजार ५३९ शेतकऱ्यांनी १ कोटी ३३ लाख ६७ हजार, परंडा तालुक्यातून ६५ हजार ७१७ शेतकऱ्यांनी १ कोटी १२ लाख ६० हजार, भूम तालुक्यातून ४८ हजार ९०८ शेतकऱ्यांनी १ कोटी ९७ हजार, कळंब तालुक्यातून १ लाख २६ हजार ६३८ शेतकऱ्यांनी २ कोटी २८ लाख २ हजार तर वाशी तालुक्यातून ६१ हजार ६९ शेतकऱ्यांनी १ कोटी १० लाख ३९ हजार असे एकूण ७ लाख ४५ हजार ३९० सभासद शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपयांचा विक्रमी पिक भरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सर्वाधिक पिक विमा भरण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.