शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तलावातील गाळ उपसून शेतकरी कुटुंबाने केला झिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:38 IST

वन्यजीवांची भागविली जाते तहान

ठळक मुद्देभारत बटालियनजवळील डोंगरातील तलावातून गाळ उपसा गाळ उपशाचे काम शासकीय पातळीवर हाती घ्यावे

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद :  सातारा परिसरातील भारत बटालियनजवळील डोंगरात छोटे-मोठे पाझर तलाव आहेत, त्यातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले नाही; परंतु तांड्यावरील एका शेतकरी कुटुंबाने तलावातील गाळ उपसून काढला अन् पाण्याचे पाझर सुरू झाले. त्यामुळे हे कुटुंबीय प्रचंड आनंदी झाले आहे. गाळ उपशाचे काम शासकीय पातळीवर हाती घेतल्यास वन्यजीवांना फायदा होऊ शकतो, यात शंका नाही.

गेल्या तीन वर्षांपासून तलावात खोदकाम करून गाळ उपसा करण्यावर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने श्रमदान करण्यावर भर दिला जात आहे. त्यास शासनाच्या यंत्रणेने देखील खूप सहकार्य केले; परंतु यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने कोणतीही यंत्रणा सातारा, देवळाईच्या कुशीत असलेल्या तलावाकडे फिरकलेले नाही. त्याचा परिणाम नागरिकांसह तसेच वन्यजीवांवर झाला आहे. पाण्यासाठी भटकंती करण्यावर वन्यजीवांवरही वेळ आलेली आहे. डोंगर भागात असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांना पाणी देणेदेखील जिकरीचे ठरत आहे.

तांड्यावरील एका शेतावर राबणारा शेतकरी सीताराम पवार यांनी टिकाव, फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. कुटुंबातील चिमुकल्यांनीही त्यांना सहकार्य दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण झाली. गुडघाभर खोदकाम केल्यावर झिऱ्यात पाणी लागले. त्या झिऱ्यातून दीड-दोन तासाला हंडा, दोन हंडे पाणी मिळू लागले. रात्री या झिऱ्यावर डोंगरातील वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

शासकीय यंत्रणेकडे केली मागणीजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मनपा आणि भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आटलेल्या जलस्रोताचे खोलीकरण करण्याची मागणी केली आहे. 

शासकीय योजनेचा लाभ सोलापूर महामार्गावर काम करणाऱ्या यंत्रणेचे सहकार्य घेऊन सातारा, देवळाई परिसरातील तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील गाळ काढावा, अशी मागणी शेतकरी कांतीलाल साकला, राजू राठोड, गणेश पवार आदींनी केली आहे. 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबाद