शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

आठ गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळेना

By | Updated: December 6, 2020 04:04 IST

कायगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील जुने कायगाव, नवीन कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, गळनिंब, ...

कायगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील जुने कायगाव, नवीन कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, गळनिंब, अगरवाडगाव, भिवधानोरा आणि धनगरपट्टी शिवारात यंदा मुसळधार पाऊस झाला. या पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब, धनगरपट्टी या शिवारातील सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचेसुद्धा शंभर टक्के नुकसान झाले. तसेच तुरीचे पीक, भुईमूग आणि मूग या पिकांचेही नुकसान झाले. यंदा या पिकाला बहरही आला नाही.

भेंडाळा शिवारातील ज्या शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली होती, त्यांनाही तोच अनुभव आला. अतिपावसाने मक्याची वाढ खुंटली. शासनाने नुकसानभरपाईबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर तहसील प्रशासनाने पिकांची पाहणी सुरु केली. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्षात भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा केला. आता या प्रक्रियेला सुद्धा दोन महिन्यांहून जास्त काळ लोटला गेला. प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र, आता या प्रक्रियेला खूपच उशीर होत आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. भेंडाळा महसूल मंडळातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा झाली आहे, मात्र त्यांची संख्या कमी आहे. प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कायगाव भागातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.