शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By admin | Updated: August 7, 2014 02:06 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी अग्रही असल्याचे दिसूृन येत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पिक विमा हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०१ शाखेत जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ कोटीवर खरीपाचा पिक विमा भरला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदा ही अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडील ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणी अद्याप ही झालेली नाही. उस्मानाबाद तालुक्यातुन ३८ हजार ५६० शेतकऱ्यांनी २ कोटी ९३ लाख ९५ हजार रुपयांचा खरीपाचा पिक विमा भरला आहे. उमरगा तालुक्यातील ३३ हजार ३१८ शेतकऱ्यांनी २ कोटी ६१ लाख ६५ हजार रुपये, तुळजापूर तालुक्यातून २५ हजार ७२६ शेतकऱ्यांनी १ कोटी ८९ लाख ६१ हजार भरले, लोहारा तालुक्यातून १० हजार ३६९ शेतकऱ्यांनी ९२ लाख ९४ रुपयांचा पिक विमा भरला, कळंब तालुक्यातून २५ हजार ४८८ शेतकऱ्यांनी २ कोटी ८ लाख ४७ हजार रुपये भरले, भूम तालुक्यातून १८ हजार ८१० शेतकऱ्यांनी १ कोटी ३७ लाख ३९ हजार, वाशी तालुक्यातून ११ हजार ६१० शेतकऱ्यांनी १ कोटी ५ लाख ४७ हजार तर परंडा तालुक्यातून २२ हजार १४७ शेतकऱ्यांनी ९३ लाख २६ हजार रुपयांचा पिका विमा भरला असे जिल्ह्यातून १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ ५० लाखावर पिक विमा जिल्हामध्यवर्तीच्या १०१ शाखेत भरला आहे. (प्रतिनिधी)