शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडली पीक विम्याची कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:08 IST

चारा, पाणी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना 

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी वैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांत पाहणी केली असता शेतकऱ्यांनी पीक विम्यासह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

जिल्ह्यात १६ लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरविना पर्याय राहिलेला नाही. ७०० गावे आणि २६० वाड्या तहानल्यामुळे ग्रामीण भाग वैराण वाळवंटाप्रमाणे झाला आहे. १ हजार ४८ टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रोजगार हमी योजनेच्या कामांना भेट दिली. चारा छावण्यांची माहिती जाणून घेतली. चारा छावण्या वाढविण्याची आवश्यकता आहे. कारण आहे त्या छावण्यांमध्ये जनावरांची संख्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वाढवावे लागतील. छावण्यांची परिस्थिती चांगली असली तरी संख्या वाढवावी लागेल. दोन ते अडीच हजार जनावरे छावण्यांमध्ये आहेत. आचारसंहिता असली तरी आवश्यक बाबींकडे लक्ष देण्यात यावे, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील.

टँकर, चारा छावण्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याच्या काही तक्रारी आल्या. काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. त्याबाबत ७ मे रोजी आढावा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केल्या, त्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या जातील. चारा, टँकर वाढविणे, फेऱ्या वाढविणे, हमी योजनेची कामे वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

आचारसंहिता असली तरी पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था करावीच लागेल. दुष्काळग्रस्त भागांमध्ये ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याबाबत ताबडतोब निर्णय व्हावेत, यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात येणार आहेत. पालकमंत्र्यांसह खा.चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदी पदाधिकाऱ्यांचा पाहणी दौऱ्यात समावेश होता. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळguardian ministerपालक मंत्रीFarmerशेतकरी