शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पीक कर्जावरून संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे कामकाज पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 19:10 IST

औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे.

आडूळ (औरंगाबाद ) : पीक कर्ज आणि एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रश्नांवर आडूळ परिसरातील शेतकऱ्यांनी आज दुपारी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे अंतर्गत कामकाजही बंद पाडले.

औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. परिसरातील तब्बल ३५ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार या बँकेशी निगडित आहे. खरिप हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यासाठी दररोज शेतकरी बँकेत चकरा मारतात. तसेच सन २०२० मध्ये शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकेतील कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करून बंद केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणे आहे. एकाही शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी आज आठवडी बाजाराच्या दिवशीच दुपारी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. बँके विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून काही वेळापर्यंत बँकेचे अंतर्गत कामकाज बंद पाडले होते. शाखा व्यवस्थापक प्रसाद आलूरकर यांनी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेची खाते बंद करून रखडलेले नवीन पीक कर्ज प्रकरण तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास गोरे, कामगार नेते हारूण पठाण, भाऊसाहेब वाघ, नवनाथ सांगळे, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ, भास्कर गिते, पाटिलबा बोन्द्रे, भीमराव ढाकणे, सतिश राख, शेख जाहेर, आडूळ खुर्दचे उपसरपंच प्रेमसिंग घुसिंगे,सतिश बचाटे,रामु पिवळ,अशोक भावले,शाम्मद सय्यद,भगवान पोपळघट,आसाराम गोर्डे,अंकुशराव जावळे, बंडू गवळी, आनंद कासलीवाल, शिवलाल राठोड, शेरू पठाण, हिरालाल राठोड, शेख अजिम, आडूळ खुर्दचे सरपंच तुळशीराम बताडे, राजू गोडसे, मुजीब पठाण, कुंडलिक आगलावे, नवनाथ आगळे, भीमराव पिवळ, शेख राजू आदींसह रजापूर, घारेगाव, एकतुनी, देवगाव, गेवराई आगलावे, हिरापुर, ब्राम्हणगांव आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पाचोड पोलिस ठाण्यातील सा पो नि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद