शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जावरून संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे कामकाज पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 19:10 IST

औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे.

आडूळ (औरंगाबाद ) : पीक कर्ज आणि एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रश्नांवर आडूळ परिसरातील शेतकऱ्यांनी आज दुपारी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे अंतर्गत कामकाजही बंद पाडले.

औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. परिसरातील तब्बल ३५ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार या बँकेशी निगडित आहे. खरिप हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यासाठी दररोज शेतकरी बँकेत चकरा मारतात. तसेच सन २०२० मध्ये शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकेतील कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करून बंद केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणे आहे. एकाही शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज मिळाले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी आज आठवडी बाजाराच्या दिवशीच दुपारी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. बँके विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून काही वेळापर्यंत बँकेचे अंतर्गत कामकाज बंद पाडले होते. शाखा व्यवस्थापक प्रसाद आलूरकर यांनी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेची खाते बंद करून रखडलेले नवीन पीक कर्ज प्रकरण तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास गोरे, कामगार नेते हारूण पठाण, भाऊसाहेब वाघ, नवनाथ सांगळे, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ, भास्कर गिते, पाटिलबा बोन्द्रे, भीमराव ढाकणे, सतिश राख, शेख जाहेर, आडूळ खुर्दचे उपसरपंच प्रेमसिंग घुसिंगे,सतिश बचाटे,रामु पिवळ,अशोक भावले,शाम्मद सय्यद,भगवान पोपळघट,आसाराम गोर्डे,अंकुशराव जावळे, बंडू गवळी, आनंद कासलीवाल, शिवलाल राठोड, शेरू पठाण, हिरालाल राठोड, शेख अजिम, आडूळ खुर्दचे सरपंच तुळशीराम बताडे, राजू गोडसे, मुजीब पठाण, कुंडलिक आगलावे, नवनाथ आगळे, भीमराव पिवळ, शेख राजू आदींसह रजापूर, घारेगाव, एकतुनी, देवगाव, गेवराई आगलावे, हिरापुर, ब्राम्हणगांव आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पाचोड पोलिस ठाण्यातील सा पो नि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद