शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण, तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी; वाजतगाजत केले शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:03 IST

अतिआत्मविश्वास नडेल, एकजुटीने व कठोर परिश्रम करून विजय मिळवून देण्याचे नाना पटोले यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पक्षातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत अनेक इच्छुक उमेदवार वाजतगाजत आले व शक्तिप्रदर्शन करून गेले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना एक इच्छुक उमेदवार वाजतगाजत येत होता. ते वाजवणं थांबवा, असे सुचवूनही ते थांबलं नाही. तेव्हा, ‘वाद्य वाजवणं थांबलं नाही तर मी संबंधित उमेदवाराचे तिकीटच कापेन,’ असा दम दिल्यानंतर वाद्य वाजवणं थांबलं आणि नाना पटोले यांना पुढील भाषण करता आलं.

सकाळी पत्रकार परिषदेनंतर जिमखाना क्लबमध्येच आढावा बैठकीसाठी पावसाची काळजी घेत भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांना खाली बसून भाषण ऐकावे लागले. एकट्या नांदेड जिल्ह्यातून एक हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याची माहिती पटोले यांनी दिली. याचवेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे व लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकृती बरी नसल्यामुळे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत.

महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, आरेफ नसीम खान व अमित देशमुख आदींची भाषणे झाली. खा. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. शक्तिप्रदर्शनाला डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यापासून सुरूवात झाली. कन्नडचे इच्छुक उमेदवार नामदेव पवार हेही समर्थकांसह आले. जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल हे मंचावर उपस्थित होते. पण त्यांचे समर्थक घोषणा देत आले. सुरेश जेथलिया, मंठ्याचे कल्याण बोराडे आदींनीही समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.

आढावा बैठकीच्या आधी रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सरकार विधानसभेची निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली. सरकारची लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची असल्याची व हे सरकार शेतकरी, शेतमजूर, युवक व महिला विरोधी असल्याची टीका केली. लाडक्या बहिणींची एवढी काळजी होती तर मग ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर का आणली? अजित पवार म्हणतात, तुम्ही जर महायुतीचं बटण नाही दाबलं तर योजना बंद होईल, असा इशारा देतात. यातच या योजनेचा उद्देश दडलेला नाही का? असे सवाल पटोले यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वर्णन लुटारू, डाकू सरकार असे करत राज ठाकरे हे कन्फ्यूज्ड नेते असल्याची टीका केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस