शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण, तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी; वाजतगाजत केले शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:03 IST

अतिआत्मविश्वास नडेल, एकजुटीने व कठोर परिश्रम करून विजय मिळवून देण्याचे नाना पटोले यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पक्षातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत अनेक इच्छुक उमेदवार वाजतगाजत आले व शक्तिप्रदर्शन करून गेले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना एक इच्छुक उमेदवार वाजतगाजत येत होता. ते वाजवणं थांबवा, असे सुचवूनही ते थांबलं नाही. तेव्हा, ‘वाद्य वाजवणं थांबलं नाही तर मी संबंधित उमेदवाराचे तिकीटच कापेन,’ असा दम दिल्यानंतर वाद्य वाजवणं थांबलं आणि नाना पटोले यांना पुढील भाषण करता आलं.

सकाळी पत्रकार परिषदेनंतर जिमखाना क्लबमध्येच आढावा बैठकीसाठी पावसाची काळजी घेत भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांना खाली बसून भाषण ऐकावे लागले. एकट्या नांदेड जिल्ह्यातून एक हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याची माहिती पटोले यांनी दिली. याचवेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे व लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकृती बरी नसल्यामुळे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत.

महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, आरेफ नसीम खान व अमित देशमुख आदींची भाषणे झाली. खा. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. शक्तिप्रदर्शनाला डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यापासून सुरूवात झाली. कन्नडचे इच्छुक उमेदवार नामदेव पवार हेही समर्थकांसह आले. जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल हे मंचावर उपस्थित होते. पण त्यांचे समर्थक घोषणा देत आले. सुरेश जेथलिया, मंठ्याचे कल्याण बोराडे आदींनीही समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.

आढावा बैठकीच्या आधी रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सरकार विधानसभेची निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली. सरकारची लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची असल्याची व हे सरकार शेतकरी, शेतमजूर, युवक व महिला विरोधी असल्याची टीका केली. लाडक्या बहिणींची एवढी काळजी होती तर मग ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर का आणली? अजित पवार म्हणतात, तुम्ही जर महायुतीचं बटण नाही दाबलं तर योजना बंद होईल, असा इशारा देतात. यातच या योजनेचा उद्देश दडलेला नाही का? असे सवाल पटोले यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वर्णन लुटारू, डाकू सरकार असे करत राज ठाकरे हे कन्फ्यूज्ड नेते असल्याची टीका केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस