शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत अतिरिक्त पाणी आले, मनपाला जे जमले नाही ते एमजीपीने करून दाखविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:30 IST

अतिरिक्त पाणी शहरात आल्यानेच नागरिकांची ओरड कमी

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही एप्रिल अखेरपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठ्यातील अनुभवी अधिकाऱ्यांना यश आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) अधिकाऱ्यांनी हर्सूल आणि जायकवाडी धरणातून प्रत्येकी पाच एमएलडी आणि रोजाबाग येथून एक एमएलडी पाणी वाढवून पाणीपुरवठा सुरळीत केला. मनपा अधिकाऱ्यांना जे जमले नाही, ते एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले, अशी कबुली बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसह एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांच्यावर जबाबदारी सोपविली. एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी हर्सूल तलावातून नियमित होणारे साडेचार ते पाच एमएलडी पाण्यात वाढ करण्याचे सुचविले. त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे ५ एमएलडी पाणी वाढणार आहे. ही उपाययोजना दीर्घकालीन आहे. रोजाबाग येथील नहर-ए-अंबरची लाईन सुरू केल्याने त्यातून १ एमएलडी पाणी वाढविण्यात आले. जायकवाडी येथे ३५० एचपीचा पंप व फारोळा येथील ३५० एचपीचा पंप सुरू केला. नवीन ट्रान्सफाॅर्मर कार्यान्वित करून २४ तास पंप सुरू ठेवत ५ एमएलडी पाणी वाढविले.

शहरात ११ एमएलडी अतिरिक्त पाणी येऊ लागले. एमआयडीसीने ३ एमएलडी पाणी देण्यास सुरुवात केली. एन-१ येथून ६१ टँकरच्या २८५ फेऱ्या दररोज होत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात सहाव्या दिवशी म्हणजेच समान पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक झोनमध्ये पालक अधिकारी नेमून पाईपलाईनची गळती शोधून दुरुस्तीचे काम करण्यात आले. शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्यात वाढ करण्याचे जमले नाही ते एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले असे प्रशासकांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

मनपा अधिकाऱ्यांची नकारात्मतापाणीपुरवठ्यात १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगला अनुभव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहराला वेगवेगळ्या पद्धतीने दिलासा देता येऊ शकतो. मात्र, पाणीपुरवठ्यातील अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता याच्या आड येत होती. कोणतीही नवीन गोष्ट करायची तर त्याला फाटे फोडण्याचे काम अधिकाऱ्यांकडून करण्यात येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी