शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हद्दपारीची मुदत संपल्याने सव्वाशे गुंड परतले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:01 IST

मनपा निवडणुकीत उपद्रव वाढण्याची शक्यता 

ठळक मुद्देपाच टक्के गुंड परगावीचसुमारे २५ टक्के हद्दपारी झाली होती रद्द

- बापू सोळुंके

औरंगाबाद : तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कालावधीत २०१७ मध्ये हद्दपार करण्यात आलेले तब्बल सव्वाशे गुंड हद्दपारीची मुदत संपल्याने शहरात परतल्याचे समोर आले आहे. यातील काही गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत पोलीस अलर्ट नाहीत. महापालिका निवडणुका जवळ आल्याने या गुन्हेगारांचा शहरात उपद्रव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

२०१७ साली गुन्हेगारांवर अंकु श ठेवण्यासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सोबतच दोन अथवा त्याहून अधिक गुन्हे असलेल्या आरोपींना शहरातून हद्दपार करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. आयुक्तांचेच आदेश असल्याने शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील पंधरा ते वीस गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सहायक आयुक्तांमार्फत परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्तांकडे सादर केला होता. 

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्यानंतर उपायुक्तांनी २०१७ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६० हून अधिक गुंडांवर सहा महिने ते दोन वर्षे कालावधीसाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतून हद्दपारीची कारवाई झाली होती. यातील काहींना केवळ शहरातून तर काहींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आली होती. यामुळे २०१७ मध्ये सुमारे १२० ते १२५ गुंड शहराबाहेर गेले होते. हद्दपारीची मुदत संपल्याने ९०-९५ टक्के गुंड औरंगाबादेत परतले आहेत. हे गुंड काय करतात, याची माहिती मात्र पोलीस दप्तरी नाही. उर्वरित पाच ते दहा टक्के गुंडांनी परगावीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने ते  शहरात आले नसावे, असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

सुमारे २५ टक्के हद्दपारी झाली होती रद्दपोलीस उपायुक्तांनी बजावलेल्या हद्दपारीच्या आदेशाला प्रत्येक गुन्हेगार विभागीय आयुक्तांकडे आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देतो. २०१७ मध्ये उभय कोर्टात २५ टक्के लोकांच्या हद्दपारीच्या नोटिसा रद्द झाल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे शिक्षाहद्दपारीची मुदत संपण्यापूर्वी विनापरवानगी शहरात येणाऱ्या तडीपार गुंडाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जातो. न्यायालयातून त्याला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्याला शहराबाहेर जाण्याचा आदेश दिला जातो. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास हद्दपार व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

हद्दपारीची मुदत संपल्यानंतर कोणतीही कारवाई नाहीएखाद्या गुंड प्रवृत्तीची व्यक्ती हद्दपारीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुन्हा शहरात येऊन राहू शकते. त्याच्याविरुद्ध              कोणतीही कारवाई करता येत नाही. शहरात परतल्यानंतर त्याने येथे कोणताही गुन्हा केला तर त्या गुन्ह्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतात.                        -डॉ. राहुल खाडे, उपायुक्त परिमंडळ-१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक