शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

हद्दपारीची मुदत संपल्याने सव्वाशे गुंड परतले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:01 IST

मनपा निवडणुकीत उपद्रव वाढण्याची शक्यता 

ठळक मुद्देपाच टक्के गुंड परगावीचसुमारे २५ टक्के हद्दपारी झाली होती रद्द

- बापू सोळुंके

औरंगाबाद : तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कालावधीत २०१७ मध्ये हद्दपार करण्यात आलेले तब्बल सव्वाशे गुंड हद्दपारीची मुदत संपल्याने शहरात परतल्याचे समोर आले आहे. यातील काही गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत पोलीस अलर्ट नाहीत. महापालिका निवडणुका जवळ आल्याने या गुन्हेगारांचा शहरात उपद्रव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

२०१७ साली गुन्हेगारांवर अंकु श ठेवण्यासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सोबतच दोन अथवा त्याहून अधिक गुन्हे असलेल्या आरोपींना शहरातून हद्दपार करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. आयुक्तांचेच आदेश असल्याने शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील पंधरा ते वीस गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सहायक आयुक्तांमार्फत परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्तांकडे सादर केला होता. 

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्यानंतर उपायुक्तांनी २०१७ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६० हून अधिक गुंडांवर सहा महिने ते दोन वर्षे कालावधीसाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतून हद्दपारीची कारवाई झाली होती. यातील काहींना केवळ शहरातून तर काहींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आली होती. यामुळे २०१७ मध्ये सुमारे १२० ते १२५ गुंड शहराबाहेर गेले होते. हद्दपारीची मुदत संपल्याने ९०-९५ टक्के गुंड औरंगाबादेत परतले आहेत. हे गुंड काय करतात, याची माहिती मात्र पोलीस दप्तरी नाही. उर्वरित पाच ते दहा टक्के गुंडांनी परगावीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने ते  शहरात आले नसावे, असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

सुमारे २५ टक्के हद्दपारी झाली होती रद्दपोलीस उपायुक्तांनी बजावलेल्या हद्दपारीच्या आदेशाला प्रत्येक गुन्हेगार विभागीय आयुक्तांकडे आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देतो. २०१७ मध्ये उभय कोर्टात २५ टक्के लोकांच्या हद्दपारीच्या नोटिसा रद्द झाल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे शिक्षाहद्दपारीची मुदत संपण्यापूर्वी विनापरवानगी शहरात येणाऱ्या तडीपार गुंडाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जातो. न्यायालयातून त्याला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्याला शहराबाहेर जाण्याचा आदेश दिला जातो. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास हद्दपार व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

हद्दपारीची मुदत संपल्यानंतर कोणतीही कारवाई नाहीएखाद्या गुंड प्रवृत्तीची व्यक्ती हद्दपारीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुन्हा शहरात येऊन राहू शकते. त्याच्याविरुद्ध              कोणतीही कारवाई करता येत नाही. शहरात परतल्यानंतर त्याने येथे कोणताही गुन्हा केला तर त्या गुन्ह्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतात.                        -डॉ. राहुल खाडे, उपायुक्त परिमंडळ-१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक