तीन कोटीचा खर्च; अस्वच्छता कायम
By Admin | Updated: July 4, 2016 00:13 IST2016-07-04T00:02:16+5:302016-07-04T00:13:53+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील नाल्यांची साफासफाई, कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाकाठी जवळपास

तीन कोटीचा खर्च; अस्वच्छता कायम
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील नाल्यांची साफासफाई, कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाकाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येतो़ या कामासाठी २४ घंटागाड्या, पालिकेचे व कंत्राटदाराचे असे जवळपास २२५ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे़ मात्र, कामाचे नियोजन कोलमडल्याने शहरातील बहुतांश भागातील नाल्यांचा प्रश्न कायम आहे़ तर कचराही वेळेवर उचलला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे़
दीड लाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहराची स्वच्छता करण्यासाठी नगर पालिकेने कंत्राट दिले आहे़ या कामी पालिकेचे जवळपास ६७ कर्मचारी, कंत्राटदारांचे जवळपास १६० कर्मचारी असे २२५ कर्मचारी कार्यरत आहेत़ पहाटे ५ ते ८ या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यांची साफासफाई आणि कचरा डंम्पिंग ग्राऊंडमध्ये नेवून टाकण्याचे काम केले जाते़ तर ८ ते ११ या वेळेत ‘डोअर- टू डोअर’ कचरा गोळा केला जातो़ तर दिवसभरात विविध भागातील नाल्या साफ करणे, कचरा उचलून कचराकुंडीत टाकण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे़ मागील महिन्यात पालिकेने विशेष स्वच्छता अभियान राबविले होते़ मात्र, रविवारी शहरातील विविध भागांची पाहणी केली असता काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून आले़ तर काही भागातील नाल्या तुंबल्याचे दिसून आले़ विशेषत: समता नगरासह, समर्थनगर भागातील काही नाल्यांवर फरशी टाकण्यात आल्याने त्या स्वच्छ करता येत नाहीत़ त्यामुळे नाल्या तुंबत आहेत़ मात्र, पालिकेकडून या फरशा काढण्याबाबत घरमालकांना सूचनाही देण्यात येत नाहीत़ शहराच्या काही भागातील अवस्था अशीच आहे़ समर्थनगर मध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे़ सह्याद्री कॉर्नरजवळील भागातही मोठी अस्वच्छता पसरली आहे़ तर नगर पालिकेच्या कार्यालयात प्रवेश करताना उजव्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीजवळच कचरा साचला आहे़ शिवाय पालिकेतही शहराच्या वाढीव हद्दीतील अनेक भागात तर नाल्यांचा पत्ताच नाही़ शिवाय इतर गैरसोयींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याशिवाय शहरातील ख्वॉजानगर, भीमनगर, ज्ञानेश्वर मंदीर परिसरासह इतर भागातील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न कायम आहे़