शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शासकीय उदासीनतेचे उदाहरण; शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 11:49 IST

तीन वेळा मागवला अहवाल,१९९६ पासून प्रयत्न केल्याने झाला जमीन मिळण्याचा मार्ग प्रशस्त

औरंगाबाद : देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांसाठी शासनाने अनेक लाभकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र, शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे खऱ्या लाभार्थींना त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. असेच एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आले. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लड्डा यांनी एक महिन्याच्या आत शहीद जवानाच्या कुटुंबाला जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रदीर्घ दिरंगाईमुळे शासनाच्या लाभकारी योजनांचा उद्देश विफल होतो, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. परिणामी १९९६ पासून प्रयत्न करीत असलेल्या शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.

काय होती याचिकापरभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कडगाव येथील भारतीय सेनेतील जवान मंचक नामदेव रणखांबे १९९६ साली ‘ऑपरेशन रक्षक’ मोहिमेत जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले होते. शासनाच्या धोरणानुसार त्यांचे कुटुंब शासकीय जमीन मिळण्यास पात्र असल्यामुळे मंचकच्या वडिलांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर अर्ज केला होता.

१९ वर्षांत मागविले तीन अहवालसोनपेठच्या तहसीलदारांनी २००२ साली, उपविभागीय अधिकाऱ्यांनी २००८ साली आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑक्टोबर २०२० ला अर्जदार लाभ मिळण्यास पात्र असल्याबाबत आणि त्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीवर कोणाचेही अतिक्रमण नसल्याबाबतचा अहवाल प्राप्त करण्यासाठी तीन अहवाल मागविले. तरीही जमीन काही दिली नाही. त्यामुळे मंचकच्या वडिलांनी ॲड. सचिन एस. देशमुख यांच्यामार्फत दिवाणी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे फेब्रुवारी २०२१ मध्येच संपूर्ण अहवाल, मंचक युद्धात जखमी (मृत) झाल्याचे प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रे पाठविली असल्याचा अहवाल खंडपीठास देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी एव्हाना त्यावर निर्णय घ्यायला हवा होता, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. ॲड. देशमुख यांना ॲड. माजीद शेख, सुयश जांगडा व योगेश बिराजदार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठparabhaniपरभणीMartyrशहीदParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीIndian Armyभारतीय जवान