शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 18:03 IST

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षाही पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेतल्या जातील (Exam as before 'offline'). ‘ऑनलाईन’च्या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर निघावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण अभय वाघ, सहसचिव दत्तात्रय कहार, सहसचिव डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. महेश शिवणकर, मंत्रालयातील कक्ष अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. पारंपरिक अध्यापन-अध्ययन झाले पाहिजे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडला पाहिजे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ विभागात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे. यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी लसीकरण केलेले नसेल, त्यांच्या संदर्भात कुलगुरुंनी निर्णय घेतला पाहिजे. संतपीठात ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाचे हे संतपीठ देशातील अग्रेसर होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मार्चपूर्वी आपण करु.

या विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत सातव्या वेतन आयोगाची आतापर्यंत १,०६९ प्रकरणे प्रलंबित होती. आज या कार्यक्रमामुळे फक्त ३२ प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे ३८ होती. यापैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली. सेवानिवृत्तीची १९२ प्रकरणे होती. शंभर टक्के ही प्रकरणे मार्गी लागली. सेवा उपदानाची सर्व १७८ प्रकरणे निकाली निघाली. वर्षभरात ३,७६९ प्रकरणांपैकी आजपर्यंत ३,४५८ प्रकरणे मार्गी लागली आहेत. हे या उपक्रमाचे फलित आहे, असे उदय सामंत म्हणाले.

व्यासपीठावर मांडले गाऱ्हाणेयावेळी तक्रारदारांनी व्यासपीठावर जाऊन मंत्री व अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या व निवेदन सादर केले. तेव्हा उदय सामंत यांनी प्रत्येकाच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रकुलगुरु ना हरकत देत नाहीत, अशी तक्रार जे. के. जाधव यांनी केली. तेव्हा सामंत यांनी प्रकुलगुरुंची चांगलीच कानउघाडणी केली. नागराज गायकवाड यांनी कुलसचिवांविरुद्ध शपथपत्राद्वारे तक्रार दाखल केली व आरोप चुकीचा निघाल्यास आपणास विद्यापीठ गेटसमोर फाशी द्यावी, अशी मागणी केली. तेव्हा शिक्षण संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर १० जणांना विविध महाविद्यालयांमध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण