शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 18:03 IST

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षाही पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेतल्या जातील (Exam as before 'offline'). ‘ऑनलाईन’च्या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर निघावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण अभय वाघ, सहसचिव दत्तात्रय कहार, सहसचिव डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. महेश शिवणकर, मंत्रालयातील कक्ष अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. पारंपरिक अध्यापन-अध्ययन झाले पाहिजे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडला पाहिजे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ विभागात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे. यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी लसीकरण केलेले नसेल, त्यांच्या संदर्भात कुलगुरुंनी निर्णय घेतला पाहिजे. संतपीठात ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाचे हे संतपीठ देशातील अग्रेसर होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मार्चपूर्वी आपण करु.

या विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत सातव्या वेतन आयोगाची आतापर्यंत १,०६९ प्रकरणे प्रलंबित होती. आज या कार्यक्रमामुळे फक्त ३२ प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे ३८ होती. यापैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली. सेवानिवृत्तीची १९२ प्रकरणे होती. शंभर टक्के ही प्रकरणे मार्गी लागली. सेवा उपदानाची सर्व १७८ प्रकरणे निकाली निघाली. वर्षभरात ३,७६९ प्रकरणांपैकी आजपर्यंत ३,४५८ प्रकरणे मार्गी लागली आहेत. हे या उपक्रमाचे फलित आहे, असे उदय सामंत म्हणाले.

व्यासपीठावर मांडले गाऱ्हाणेयावेळी तक्रारदारांनी व्यासपीठावर जाऊन मंत्री व अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या व निवेदन सादर केले. तेव्हा उदय सामंत यांनी प्रत्येकाच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रकुलगुरु ना हरकत देत नाहीत, अशी तक्रार जे. के. जाधव यांनी केली. तेव्हा सामंत यांनी प्रकुलगुरुंची चांगलीच कानउघाडणी केली. नागराज गायकवाड यांनी कुलसचिवांविरुद्ध शपथपत्राद्वारे तक्रार दाखल केली व आरोप चुकीचा निघाल्यास आपणास विद्यापीठ गेटसमोर फाशी द्यावी, अशी मागणी केली. तेव्हा शिक्षण संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर १० जणांना विविध महाविद्यालयांमध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण