शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी काय पण ! जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या स्वतंत्र गटाचा कल भाजपकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:29 IST

सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देदहा सदस्यांची जुळवाजुळव राजकीय घडामोडींना वेग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्यासाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती झालेली असली, तरी ती किमान जिल्हा परिषदेत पुढे कायम राहीलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काँग्रेसच्या ११ सदस्यांना सोबत घेऊन एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. सत्तेत असलेली शिवसेनेची साथ सोडायची आणि भाजपसोबत हातमिळवणी करायची. या अनुषंगाने जिल्हा परिषदेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडाभरात यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीच्या मुद्यांवरून काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय ऐनवेळी मागे घेतला. निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्तार यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत जवळीक साधली. नुकतच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचा एक वेगळा गट स्थापन करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. या गटासाठी सिल्लोड तालुक्यातून निवडून आलेले चार सदस्य, कन्नडचे तीन सदस्य, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक सदस्य गळाला लागू शकतो. असे असले तरी वेगळा झालेला हा काँग्रेसचा गट सेनेसोबत राहावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ११ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या १० सदस्यांची जुळवाजुळव झालेली आहे. कोणता एक सदस्य गळाला लागतो, यासाठी चाचपणी सुरू आहे. अडीच वर्षांनंतर या स्वतंत्र गटातील काही सदस्य थेट भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष!

सत्ताबदल होण्याची शक्यताजिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता; परंतु शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सेना-काँग्रेस आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली, ती सध्याही आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषदेत हा सत्ताबदल अपेक्षित आहे.  सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जि.प.तील संख्याबळभाजप -     २३शिवसेना -    १८काँग्रेस -     १६राष्ट्रवादी -    ०२मनसे -     ०१रिपाइं -     ०१अपक्ष -     ०१एकूण -     ६२

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस