शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सत्तेसाठी काय पण ! जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या स्वतंत्र गटाचा कल भाजपकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:29 IST

सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देदहा सदस्यांची जुळवाजुळव राजकीय घडामोडींना वेग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्यासाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती झालेली असली, तरी ती किमान जिल्हा परिषदेत पुढे कायम राहीलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काँग्रेसच्या ११ सदस्यांना सोबत घेऊन एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. सत्तेत असलेली शिवसेनेची साथ सोडायची आणि भाजपसोबत हातमिळवणी करायची. या अनुषंगाने जिल्हा परिषदेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडाभरात यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीच्या मुद्यांवरून काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय ऐनवेळी मागे घेतला. निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्तार यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत जवळीक साधली. नुकतच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचा एक वेगळा गट स्थापन करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. या गटासाठी सिल्लोड तालुक्यातून निवडून आलेले चार सदस्य, कन्नडचे तीन सदस्य, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक सदस्य गळाला लागू शकतो. असे असले तरी वेगळा झालेला हा काँग्रेसचा गट सेनेसोबत राहावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ११ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या १० सदस्यांची जुळवाजुळव झालेली आहे. कोणता एक सदस्य गळाला लागतो, यासाठी चाचपणी सुरू आहे. अडीच वर्षांनंतर या स्वतंत्र गटातील काही सदस्य थेट भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष!

सत्ताबदल होण्याची शक्यताजिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता; परंतु शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सेना-काँग्रेस आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली, ती सध्याही आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषदेत हा सत्ताबदल अपेक्षित आहे.  सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जि.प.तील संख्याबळभाजप -     २३शिवसेना -    १८काँग्रेस -     १६राष्ट्रवादी -    ०२मनसे -     ०१रिपाइं -     ०१अपक्ष -     ०१एकूण -     ६२

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस