शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओझोन थराच्या संरक्षणासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:12 IST

१९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.

औरंगाबाद : १९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी केवळ एक दिवसाचे कौतुक करून उपयोग नाही. तर यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नशील राहून कार्बन उत्सर्जित करणाऱ्या घटकांच्या वापरासंबंधी स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन एपीजे अब्दुल कलाम संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.मानवी हस्तक्षेपामुळे काही वायूंचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्सर्जन यामुळे ओझोनच्या थराला छिद्र पडले असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाने १९८७ साली जाहीर केले. यानंतर १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.याविषयी अधिक सांगताना औंधकर म्हणाले की, या संघटनांच्या म्हणण्यानुसार ओझोनच्या थराला छिद्र पडले आणि आता त्याची रिकव्हरी म्हणजेच भरपाई होत असल्याचा या संघटनांचा दावा पूर्णपणे अविश्वसनीय वाटतो.ज्या घटकांमुळे ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होतो, अशा वायूंचे प्रमाण १९८७ च्या तुलनेत आज निश्चितच वाढलेले आहे, त्यामुळे मग ओझोन रिकव्हरीविषयी या संस्थांचा दावा खरा कसा मानायचा, असा प्रश्न उपस्थित करून या सर्व गोष्टींवर संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि दैनंदिन जीवनातून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असे औंधकर यांनी सुचविले.>ओझोन थरासाठी मंदी फायद्याचीमंदीचा सर्वात मोठा फटका वाहन उद्योगाला बसला असून वाहन विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. ही गोष्ट ओझोन थर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आनंददायी वाटते. कारण यानिमित्ताने का होईना पण रस्त्यावरील वाहनांची संख्या घटेल. यासोबतच इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने टीव्ही, ओव्हन, रेफ्रीजरेटर, वाहन या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे.