शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ओझोन थराच्या संरक्षणासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:12 IST

१९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.

औरंगाबाद : १९९५ पासून ओझोन दिन साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत वृक्षतोड, वाहनांची संख्या, उष्णता निर्माण करणारी उपकरणे यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी केवळ एक दिवसाचे कौतुक करून उपयोग नाही. तर यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नशील राहून कार्बन उत्सर्जित करणाऱ्या घटकांच्या वापरासंबंधी स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन एपीजे अब्दुल कलाम संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.मानवी हस्तक्षेपामुळे काही वायूंचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्सर्जन यामुळे ओझोनच्या थराला छिद्र पडले असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाने १९८७ साली जाहीर केले. यानंतर १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.याविषयी अधिक सांगताना औंधकर म्हणाले की, या संघटनांच्या म्हणण्यानुसार ओझोनच्या थराला छिद्र पडले आणि आता त्याची रिकव्हरी म्हणजेच भरपाई होत असल्याचा या संघटनांचा दावा पूर्णपणे अविश्वसनीय वाटतो.ज्या घटकांमुळे ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होतो, अशा वायूंचे प्रमाण १९८७ च्या तुलनेत आज निश्चितच वाढलेले आहे, त्यामुळे मग ओझोन रिकव्हरीविषयी या संस्थांचा दावा खरा कसा मानायचा, असा प्रश्न उपस्थित करून या सर्व गोष्टींवर संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि दैनंदिन जीवनातून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असे औंधकर यांनी सुचविले.>ओझोन थरासाठी मंदी फायद्याचीमंदीचा सर्वात मोठा फटका वाहन उद्योगाला बसला असून वाहन विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. ही गोष्ट ओझोन थर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आनंददायी वाटते. कारण यानिमित्ताने का होईना पण रस्त्यावरील वाहनांची संख्या घटेल. यासोबतच इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने टीव्ही, ओव्हन, रेफ्रीजरेटर, वाहन या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे.