शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By विकास राऊत | Updated: March 14, 2023 13:14 IST

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याच्या घोषणेला झाले ९ महिने

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : राज्यात सरकार बदलून ९ महिने झाले आहेत. तरीही शेतकरी आत्महत्यांचा आलेख काही खाली आलेला नाही. नवीन वर्षातील ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५२ आत्महत्या झाल्या असून, सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते.

नवीन सरकार सत्तेवर येताच राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारमधील मंत्रीच शेतकरी आत्महत्या ही नित्याची बाब झाल्याचे वक्तव्य करून जखमेवर मीठ चोळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. विरोधकांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

सावकारी कर्जाचा पाश, नापिकी, अतिवृष्टीची कारणेसावकारी कर्जाचे व्याज जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची परतफेड करणे शक्य होत नाही, अशी तक्रार मध्यंतरी विभागीय आयुक्तालयाकडे आली होती. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टीमराठवाड्यात मागील चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याबीड जिल्ह्यात गेल्या ७२ दिवसांत ५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून सावकारी कर्जाचा पाश४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाहीये. हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात आहे.- राजन क्षीरसागर, सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा

नवीन वर्षांतील ७२ दिवसांत १६४ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर : १६जालना : ११परभणी : १४हिंगोली : ३नांदेड : २५बीड : ५२लातूर : १०धाराशिव : ३२एकूण : १६३

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद