शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सरकार बदलले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच, ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By विकास राऊत | Updated: March 14, 2023 13:14 IST

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याच्या घोषणेला झाले ९ महिने

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : राज्यात सरकार बदलून ९ महिने झाले आहेत. तरीही शेतकरी आत्महत्यांचा आलेख काही खाली आलेला नाही. नवीन वर्षातील ७२ दिवसांत १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५२ आत्महत्या झाल्या असून, सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते.

नवीन सरकार सत्तेवर येताच राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारमधील मंत्रीच शेतकरी आत्महत्या ही नित्याची बाब झाल्याचे वक्तव्य करून जखमेवर मीठ चोळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. विरोधकांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

सावकारी कर्जाचा पाश, नापिकी, अतिवृष्टीची कारणेसावकारी कर्जाचे व्याज जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची परतफेड करणे शक्य होत नाही, अशी तक्रार मध्यंतरी विभागीय आयुक्तालयाकडे आली होती. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टीमराठवाड्यात मागील चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याबीड जिल्ह्यात गेल्या ७२ दिवसांत ५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून सावकारी कर्जाचा पाश४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाहीये. हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात आहे.- राजन क्षीरसागर, सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा

नवीन वर्षांतील ७२ दिवसांत १६४ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर : १६जालना : ११परभणी : १४हिंगोली : ३नांदेड : २५बीड : ५२लातूर : १०धाराशिव : ३२एकूण : १६३

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद