शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 6:33 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे.

ठळक मुद्देया संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था महिनाभरात कार्यान्वित करण्याचा निर्णय याविषयी स्थापन केलेल्या समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी दिली. या संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने विद्यापीठात संशोधन संस्था स्थापन करण्याचा ठराव विद्यापीठाच्या २० मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावानुसार याविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. या बैठकीला समितीचे सदस्य पंकज भारसाखळे, विजय सुबुकडे उपस्थित होते, तर संजय निंबाळकर, प्रा. संभाजी भोसले हे अनुपस्थित होते. मात्र, त्यांना बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. देहाडे यांनी सांगितले. 

विलासराव देशमुख संशोधन संस्थेच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी खाजगी संस्थेकडून महिनाभरात एक सविस्तर अहवाल तयार करून घ्यावा, संस्थेचा संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि विलासराव देशमुख यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या मान्यतेसाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला आणि निधीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. देहाडे यांनी दिली.

ग्रामीण संशोधनासाठी तीन संस्थाविद्यापीठात ग्रामीण भागातील समस्या, शेती उपायांवर संशोधन करण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला दीडशे कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०१६ मध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. तेव्हापासून आतापर्यंत एक रुपयाही सरकारने दिला नाही. या संस्थेत मागील शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नव्हता. याशिवाय विद्यापीठात ग्रामीण विकास अध्यासन केंद्रही कार्यान्वित केलेले आहे. यानंतर विलासराव देशमुख संशोधन संस्था ही ग्रामीण भागावर संशोधन करणारी तिसरी संस्था असणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRural Developmentग्रामीण विकास