शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:57 IST

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे.

ठळक मुद्देपुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूतजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेलीजबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shivar) कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. तसेच ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेल्यामुळे मराठवाड्यात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देऊळगावकर यांनी केला. मात्र, भाजपने देऊळगावकर यांनी केलेला दावा आणि आरोप फेटाळून लावला आहे. (environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada)

मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्याच वेळेला अनेक तज्ज्ञमंडळींनी तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, असे सांगितले होते.  सर्व कामे बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे, अशी टीका देऊळगावकर यांनी केली. 

जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरे पाहता नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे हे घटक आहेत. वाळू, आजूबाजूची झाडी, ती नष्ट झाल्यामुळे माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे, हे मोजले पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळे प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी देऊळगावकर यांनी केली. 

दरम्यान, एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी सदर दावे, आरोप फेटाळून लावले.  

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेMarathwadaमराठवाडा