शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:57 IST

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे.

ठळक मुद्देपुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूतजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेलीजबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shivar) कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. तसेच ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेल्यामुळे मराठवाड्यात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देऊळगावकर यांनी केला. मात्र, भाजपने देऊळगावकर यांनी केलेला दावा आणि आरोप फेटाळून लावला आहे. (environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada)

मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्याच वेळेला अनेक तज्ज्ञमंडळींनी तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, असे सांगितले होते.  सर्व कामे बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे, अशी टीका देऊळगावकर यांनी केली. 

जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरे पाहता नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे हे घटक आहेत. वाळू, आजूबाजूची झाडी, ती नष्ट झाल्यामुळे माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे, हे मोजले पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळे प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी देऊळगावकर यांनी केली. 

दरम्यान, एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी सदर दावे, आरोप फेटाळून लावले.  

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेMarathwadaमराठवाडा