शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:57 IST

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे.

ठळक मुद्देपुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूतजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेलीजबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukt Shivar) कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. तसेच ही योजना अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेल्यामुळे मराठवाड्यात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देऊळगावकर यांनी केला. मात्र, भाजपने देऊळगावकर यांनी केलेला दावा आणि आरोप फेटाळून लावला आहे. (environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada)

मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्याच वेळेला अनेक तज्ज्ञमंडळींनी तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, असे सांगितले होते.  सर्व कामे बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे, अशी टीका देऊळगावकर यांनी केली. 

जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज

जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरे पाहता नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे हे घटक आहेत. वाळू, आजूबाजूची झाडी, ती नष्ट झाल्यामुळे माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे, हे मोजले पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळे प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी देऊळगावकर यांनी केली. 

दरम्यान, एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी सदर दावे, आरोप फेटाळून लावले.  

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेMarathwadaमराठवाडा