शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वाळूज एमआयडीसीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:55 IST

महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या परिस्थितीत कर्मचाºयांचे पाठबळ वाढविण्यासाठी ‘एचआर’ विभागातील अधिकारी एकजूट झाले आहेत.औरंगाबाद एचआर फोरमतर्फे सोमवारी ‘एचआर’च्या सुरक्षेसंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सोमेन मजूमदार, लक्ष्मण यमगार, ओमप्रकाश कसानिया, शशिकांत जोशी, शरद गीते, सतीश यादव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, चितेगाव औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होत आहे. त्याबरोबर या क्षेत्राला नवनव्या कलहांना सामोरे जावे लागत आहे. हे कलह कंपन्यांच्या आड येत आहेत.कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात कर्मचाºयांची काळजी घेण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केला जातो. यामध्ये कोणत्याही बाधेचा विचार न करता ‘एचआर’ समुदाय एका भिंतीप्रमाणे सर्वात पुढे उभे राहतो. त्यामुळे ‘एचआर’च्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हर्षल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीसाठी प्रशांत कोळेश्वर, योगेश जाधव यांनी प्रयत्न केले.धमक्या, मारहाणीत वाढ‘एचआर’ला अनेक कारणांनी धमक्या येणे, मारहाण होण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याप्रमाणे ते लोकांना रोजगार प्रदान करतात, त्याचप्रमाणे कंपनीत शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी काहींना कामावरून बडतर्फ ही करतात.औद्योगिक शांती जपून ठेवण्यासाठी एचआर विभाग प्रयत्न करीत असतो. या विभागातील प्रत्येक जण डॉक्टरांप्रमाणे सेवा देतात. सध्याच्या असुरक्षेच्या वातावरणात कर्मचाºयांचे पाठबळ वाढविणे ही काळाची गरज असल्याचा सूर बैठकीत निघाला.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षण