शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये अफूची शेती करणा-या २५ शेतकर्‍यांना सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: April 7, 2015 18:00 IST

परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्‍यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अंबाजोगाई : परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्‍यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील तिसरे अपर व सत्र न्या. एन.एस. कोल्हे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर १३शेतकर्‍यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २0१२मध्ये अफू शेतीचे प्रकरण उघडकीस आले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात अडकलेले शेतकरी अनेक दिवस जेलमध्ये होते. अफूप्रकरणी एकाच वेळी इतक्या मोठय़ा शेतकर्‍यांना शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.सुरेश नवृत्ती शेप, पांडुरंग नवृत्ती शेप, संभाजी लिंबाजी शिंदे, बालासाहेब लिंबाजी शिंदे, आत्माराम विनायक शेप, उद्धव विठ्ठल मोरे, मधुकर माणिक शेप, भास्कर त्रिंबक शेप, उद्धव गणपती देशमुख, सदाशिव रघुनाथ थावरे, ज्ञानोबा कोंडीबा मोरे, नवनाथ रघुनाथ थावरे, भीमराव कोंडीबा शिंदे, विष्णू कोंडीबा शिंदे, शेख पाशु शेख महेबुब, भीमराव नेमा राठोड, दिना नेमा राठोड, लाला रामभाऊनिंबाळकर, भगवान कोंडीबा शिंदे, बिभिषण नारायण शेप, हरिभाऊ मुकुंद कोकाटे, सुरेश नेमा राठोड, शिवाजी दगडू राठोड, चंद्रसेन दत्ताेबा थावरे, बापू दत्ताेबा थावरे अशी शिक्षा सुनावलेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.परळी तालुक्यातील मोहा, वंजारवाडी, घोलपतांडा या ठिकाणच्या ३९शेतकर्‍यांनी २६ एकर दोन गुंठे शेतजमिनीत बेकायदेशीरपणे अफुची लागवड केली होती. हा प्रकार सिरसाळा पोलीस स्टेशनला माहित झाल्याने २४ फेब्रुवारी २0१२रोजी पोलिसांनी कारवाई करून २७ हजार ७७0किलोग्रॅम अफुचे ओले पीक जप्त केले. याची किंमत एक कोटी ३६ लाख रुपये होती. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक लक्ष्मण विठ्ठल मंकावार यांच्या फिर्यादीवरून ३९ शेतकर्‍यांविरूद्ध कलम १८ (ब) ४६ एन.डी.एस. व कलम १९८५च्या अनुवैज्ञानिक औषधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.या प्रकरणाचा पोलीस तपास बीड येथील गुन्हा व अन्वेशन शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला. या प्रकरणीे पोलिसांनी ३८ जणांना अटक केली होती तर एकजण फरार राहिला. पोलीस तपासानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाईतील तिसरे अप्पर व सत्र न्यायाधीश एन.एस. कोले यांच्या न्यायालयासमोर आले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील किशोर गिरवलकर यांनी २६ साक्षीदार तपासले. व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे सादर केले. तपास पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची व्हीडिओ चित्रफीत न्यायालयासमोर सादर केली. पुरावे ग्राह्य धरून अफुची बेकायदेशीरपणे लागवड करणे, लागवड केल्याची माहिती दडविणे व मनोवैज्ञानिक औषधी प्रतिबंध कायद्यान्वये या २५ जणांना दोषी ठरवून प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख रुपये दंड तसेच कलम ४६ अंतर्गत सहा महिने तेरा शेतकर्‍यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील कायम फरार राहिलेला व्यापारी सुकविंदरसिंह दर्शनसिंग धिल्लो या घटनेपासून आजतागायत फरार आहे.

■ अफू लागवड प्रकरणाची अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे मोहा, घोरपडतांडा व वंजारवाडी, पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी न्यायालयात गर्दी केली होती.