शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 15:28 IST

पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता.

औरंगाबाद: ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेत सरकारकडून खरीप पिके व फळबाग यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र पैठणमध्ये तहसील कार्यालयात अनुदान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क नुकसान भरपाईच्या यादीत स्वता:च्या वडिलांचे नाव टाकून अनुदानाची रक्कम वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. मात्र याच कार्यालयात खाजगी कंपनीमार्फत काम करणाऱ्या प्रदीप नेहाले याने यादीत फेरफार करीत लाभार्थींना डावलून इतर लोकांच्या नावाने अनुदान वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नेहाले याने स्वता:च्या नातेवाईक आणि वडिलांच्या नावाने सुद्धा अनुदान लाटले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. थेरगाव येथे नेहाले याची वडिलांच्या नावे 1 हेक्टर 65 आर जमीन असून त्यापैकी 0.60 क्षेत्रावर मोसंबीची लागवड असल्याचा अहवाल तलाठी यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र त्याने यादीत फेरफार करून स्वता:च्या वडिलांच्या नावे 1 हेक्टरवर मोसंबीच पिक लावले असल्याचे दाखवून 18000 रुपयाचे अनुदान लाटले असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणीशेतकरी आधीच संकटात असताना त्याच्या हक्काच्या अनुदानावर सुद्धा शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी डल्ला मारत आहे. विशेष म्हणजे प्रदीप नेहाले याने तालुक्यातील अनेक बोगस शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान टाकून त्यांच्याकडून पैसे घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. - जयाजी सूर्यवंशी ( शेतकरी नेते )