शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पुढील वर्षी जालन्याहून धावणार इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:53 IST

लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान ५ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण संस्थेने (सीओआरई) देशभरातील रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य (टार्गेट) प्रसिद्ध केले आहे. यातून जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरण पुढील वर्षाच्या प्रारंभी पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अंकाई ते परसोडा दरम्यान काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत २६ मार्च रोजी चाचणी घेण्यात आली. यावेळी ताशी १०० किमीच्या वेगाने इलेक्ट्रिक इंजिन धावले. आता फेब्रुवारी २०२३ जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

वेळेवर काम पूर्ण व्हावे

औरंगाबाद - रोटेगाव रेल्वे मार्गाचे सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद - जालना रेल्वे मार्गाचे फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आशा आहे की, कंत्राटदार कंपनी हे काम वेळेत पूर्ण करेल आणि लवकरच औरंगाबादवरून विद्युत इंजिनवर रेल्वे धावतील.

-स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद