शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:50 IST

१९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी असलेले भुजंगराव कुलकर्णी सांगत आहेत क्षणचित्रे

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यानंतरही मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी हैदराबादेत नोकरीला असल्यामुळे मराठवाड्यातील निवडणुकीचा जास्त संबंध आला नाही. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीला औरंगाबादचा जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी असल्यामुळे औरंगाबाद आणि जालना (तेव्हा एकच जिल्हा अस्तित्वात होता.) लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी होतो.

या निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी औरंगाबादेतील आमखास मैदान, जालना आणि जळगाव लोकसभेसाठी फर्दापूर जवळच्या एका खेड्यात प्रचार सभा घेतली. याच दौऱ्यात नेहरू यांनी वेरूळ, अजिंठा लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यांचा मुक्काम औरंगाबाद हॉटेलमध्ये होता. त्या हॉटेलमधून नेहरू यांचे जेवण, चहा, नाश्ता जालना, अजिंठ्यापर्यंत येत असे. जिल्हाधिकारी असल्यामुळे नेहरूंना लेण्या दाखविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तब्येत खराब झाल्यामुळे या दौऱ्याच्या मध्यातून जावे लागले. उमेदवार तीन-चार असल्यामुळे जास्त प्रचार वगैरे काही नसे. शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवार भेटी देत. तेव्हा प्रचार करण्यासाठी अडचणी खूप होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवघ्या दोन गाड्या होत्या. त्याच गाड्यांतून फिरावे लागे. पेट्रोल देण्यासाठी एक अधिकारी होता. त्याने कूपन दिल्यानंतरच पेट्रोल मिळत असे. निवडणुकीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रकच घ्याव्या लागत. निवडणुकीचे सामान, अधिकारी आणि कर्मचारी त्या गाड्यांमधूनच मतदानाच्या एक दिवस अगोदर गावात पोहोचत. निवडणुकीचे अतिरिक्त साहित्य घेऊन जावे लागे. कारण पुन्हा त्या गावात ऐनवेळी काहीही पोहोचवता येणे शक्य नव्हते. एक हजार मताला मतदान केंद्र होते. 

तीन-चार वाड्यांसाठी एक मतदान केंद्र दिले जाई. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत. मतदान केंद्रांना भेटी देत होेतो. आमच्या गाड्यातही निवडणुकीचे साहित्य ठेवलेले असायचे. काही अडचण आली की, ते मतदान केंद्रांवर देत असत. निवडणुकीपूर्वी केली जाणारी तयारीच महत्त्वाची असे. ऐनवेळी काहीही मिळत नसे. त्या निवडणुकीत जळगावला पाटसकर होते. औरंगाबादेत काँग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ आणि कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. मिरजकर निवडणुकीला उभे होते. यात स्वामीजी जिंकले. जालना मतदारसंघात तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीचे बाबासाहेब सवणेकर उभे होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा निवडणुकीत आचारसंहिता वगैरे असला काही प्रकार नव्हता. निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत झालेल्या चुकांमधून आगामी निवडणुकीत दुरुस्ती करीत होता. १९५७ साली केलेल्या निवडणुकीच्या कामाचे कौतुक विजयी उमेदवार स्वामी रामानंद तीर्थ आणि विरोधी उमेदवार कॉ. मिरजकर यांनी पत्र पाठवून केले होते.

- भुजंगराव कुलकर्णी, ( सेवानिवृत्त आयएएस अधिकारी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक