शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:50 IST

१९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी असलेले भुजंगराव कुलकर्णी सांगत आहेत क्षणचित्रे

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यानंतरही मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी हैदराबादेत नोकरीला असल्यामुळे मराठवाड्यातील निवडणुकीचा जास्त संबंध आला नाही. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीला औरंगाबादचा जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी असल्यामुळे औरंगाबाद आणि जालना (तेव्हा एकच जिल्हा अस्तित्वात होता.) लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी होतो.

या निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी औरंगाबादेतील आमखास मैदान, जालना आणि जळगाव लोकसभेसाठी फर्दापूर जवळच्या एका खेड्यात प्रचार सभा घेतली. याच दौऱ्यात नेहरू यांनी वेरूळ, अजिंठा लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यांचा मुक्काम औरंगाबाद हॉटेलमध्ये होता. त्या हॉटेलमधून नेहरू यांचे जेवण, चहा, नाश्ता जालना, अजिंठ्यापर्यंत येत असे. जिल्हाधिकारी असल्यामुळे नेहरूंना लेण्या दाखविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तब्येत खराब झाल्यामुळे या दौऱ्याच्या मध्यातून जावे लागले. उमेदवार तीन-चार असल्यामुळे जास्त प्रचार वगैरे काही नसे. शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवार भेटी देत. तेव्हा प्रचार करण्यासाठी अडचणी खूप होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवघ्या दोन गाड्या होत्या. त्याच गाड्यांतून फिरावे लागे. पेट्रोल देण्यासाठी एक अधिकारी होता. त्याने कूपन दिल्यानंतरच पेट्रोल मिळत असे. निवडणुकीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रकच घ्याव्या लागत. निवडणुकीचे सामान, अधिकारी आणि कर्मचारी त्या गाड्यांमधूनच मतदानाच्या एक दिवस अगोदर गावात पोहोचत. निवडणुकीचे अतिरिक्त साहित्य घेऊन जावे लागे. कारण पुन्हा त्या गावात ऐनवेळी काहीही पोहोचवता येणे शक्य नव्हते. एक हजार मताला मतदान केंद्र होते. 

तीन-चार वाड्यांसाठी एक मतदान केंद्र दिले जाई. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत. मतदान केंद्रांना भेटी देत होेतो. आमच्या गाड्यातही निवडणुकीचे साहित्य ठेवलेले असायचे. काही अडचण आली की, ते मतदान केंद्रांवर देत असत. निवडणुकीपूर्वी केली जाणारी तयारीच महत्त्वाची असे. ऐनवेळी काहीही मिळत नसे. त्या निवडणुकीत जळगावला पाटसकर होते. औरंगाबादेत काँग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ आणि कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. मिरजकर निवडणुकीला उभे होते. यात स्वामीजी जिंकले. जालना मतदारसंघात तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीचे बाबासाहेब सवणेकर उभे होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा निवडणुकीत आचारसंहिता वगैरे असला काही प्रकार नव्हता. निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत झालेल्या चुकांमधून आगामी निवडणुकीत दुरुस्ती करीत होता. १९५७ साली केलेल्या निवडणुकीच्या कामाचे कौतुक विजयी उमेदवार स्वामी रामानंद तीर्थ आणि विरोधी उमेदवार कॉ. मिरजकर यांनी पत्र पाठवून केले होते.

- भुजंगराव कुलकर्णी, ( सेवानिवृत्त आयएएस अधिकारी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक