शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:50 IST

१९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी असलेले भुजंगराव कुलकर्णी सांगत आहेत क्षणचित्रे

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यानंतरही मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी हैदराबादेत नोकरीला असल्यामुळे मराठवाड्यातील निवडणुकीचा जास्त संबंध आला नाही. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीला औरंगाबादचा जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी असल्यामुळे औरंगाबाद आणि जालना (तेव्हा एकच जिल्हा अस्तित्वात होता.) लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी होतो.

या निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी औरंगाबादेतील आमखास मैदान, जालना आणि जळगाव लोकसभेसाठी फर्दापूर जवळच्या एका खेड्यात प्रचार सभा घेतली. याच दौऱ्यात नेहरू यांनी वेरूळ, अजिंठा लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यांचा मुक्काम औरंगाबाद हॉटेलमध्ये होता. त्या हॉटेलमधून नेहरू यांचे जेवण, चहा, नाश्ता जालना, अजिंठ्यापर्यंत येत असे. जिल्हाधिकारी असल्यामुळे नेहरूंना लेण्या दाखविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तब्येत खराब झाल्यामुळे या दौऱ्याच्या मध्यातून जावे लागले. उमेदवार तीन-चार असल्यामुळे जास्त प्रचार वगैरे काही नसे. शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवार भेटी देत. तेव्हा प्रचार करण्यासाठी अडचणी खूप होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवघ्या दोन गाड्या होत्या. त्याच गाड्यांतून फिरावे लागे. पेट्रोल देण्यासाठी एक अधिकारी होता. त्याने कूपन दिल्यानंतरच पेट्रोल मिळत असे. निवडणुकीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रकच घ्याव्या लागत. निवडणुकीचे सामान, अधिकारी आणि कर्मचारी त्या गाड्यांमधूनच मतदानाच्या एक दिवस अगोदर गावात पोहोचत. निवडणुकीचे अतिरिक्त साहित्य घेऊन जावे लागे. कारण पुन्हा त्या गावात ऐनवेळी काहीही पोहोचवता येणे शक्य नव्हते. एक हजार मताला मतदान केंद्र होते. 

तीन-चार वाड्यांसाठी एक मतदान केंद्र दिले जाई. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत. मतदान केंद्रांना भेटी देत होेतो. आमच्या गाड्यातही निवडणुकीचे साहित्य ठेवलेले असायचे. काही अडचण आली की, ते मतदान केंद्रांवर देत असत. निवडणुकीपूर्वी केली जाणारी तयारीच महत्त्वाची असे. ऐनवेळी काहीही मिळत नसे. त्या निवडणुकीत जळगावला पाटसकर होते. औरंगाबादेत काँग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ आणि कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. मिरजकर निवडणुकीला उभे होते. यात स्वामीजी जिंकले. जालना मतदारसंघात तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीचे बाबासाहेब सवणेकर उभे होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा निवडणुकीत आचारसंहिता वगैरे असला काही प्रकार नव्हता. निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत झालेल्या चुकांमधून आगामी निवडणुकीत दुरुस्ती करीत होता. १९५७ साली केलेल्या निवडणुकीच्या कामाचे कौतुक विजयी उमेदवार स्वामी रामानंद तीर्थ आणि विरोधी उमेदवार कॉ. मिरजकर यांनी पत्र पाठवून केले होते.

- भुजंगराव कुलकर्णी, ( सेवानिवृत्त आयएएस अधिकारी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक