शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

मी पाहिलेली निवडणूक....नोकरीची तमा न बाळगता प्रचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:30 IST

जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते.

देशभरात आणीबाणी लागू केल्यानंतर दडपशाही सुरू होती. त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशव्यापी मोहीम उघडली. जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते. १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 

जनता पक्षाकडून डॉ. बापूसाहेब काळदाते आणि काँग्रेसकडून अब्दुल अझीम औरंगाबाद लोकसभेसाठी उभे राहिले. जनता पक्षाचे शहराध्यक्ष शालिग्राम बसैये यांनी माझी सिडको-हडको विभागाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तेव्हा मी वसंतराव नाईक महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर नोकरी करत होतो. नोकरीची तमा न बाळगता प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. आणीबाणीतील दडपशाही, भ्रष्टाचार याविरोधात बापूसाहेब काळदाते, गोविंदभाई श्रॉफ, मधू लिमये आदींनी रान पेटवले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात लाट निर्माण झाली होती. या लाटेत काळदाते यांना मोठा विजय मिळाला. पुढे १९८४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही एस काँग्रेसकडून साहेबराव पाटील डोणगावकर, आय काँग्रेसकडून अब्दुल अझीम आणि हाजी मस्तान यांनी काढलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक व सुरक्षा महासंघाने उमेदवार दिला. यात मुस्लिम मताचे विभाजन झाल्यामुळे साहेबराव पाटील डोणगावकर निवडून आले. त्यांना जनता पक्षानेही पाठिंबा दिला होता.

पुढे शहरात शिवसेनेचे वारे वाहू लागले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दौरे सुरू झाले. शिवसैनिक पक्षवाढीसाठी अहोरात्र कष्ट घेत होते. यात प्रामुख्याने माझाही समावेश होता. आक्रमकपणे हिंदूंची बाजू मांडली जात होती. १९८८ साली पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. मात्र, काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी मिळून काळे यांना महापौर बनविले. शिवसेना नगरसेवक आक्रमक होते. त्यांची दहशत निर्माण झाली होती. त्यात सर्वात आघाडीवर मीच होतो. एक वर्ष होताच पुन्हा महापौरांच्या निवडणुका लागल्या. त्यात मोरेश्वर सावे हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी आरपीआयच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेत महापौरपद पटकावले. त्या निवडणुकीत आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले.

मोरेश्वर सावे वर्षभर महापौर होते. त्यानंतर महापौरपदाची संधी माझ्याकडे चालून आली होती. मात्र, सावे यांनी त्यासाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावे यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत होती. आपल्याकडे पैसे नव्हते. त्यातही विरोध पत्करून, धाडस दाखवून जी शिवसेना उभी केली. त्याच शिवसेनेत पदासाठी पैसे देण्यास ठाम नकार दर्शविला. त्यामुळे माझी संधी हुकली. प्रदीप जैस्वाल यांना महापौर बनविले. १९८९ साली मोरेश्वर सावे यांना शिवसेनेकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काहीही केलेले नव्हते. ‘आयत्या पिठावर भाकरी’ थापण्याचे काम त्यांनी केले.

तेव्हाच सावे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात गुप्त करार झाला होता. लोकसभेला सावे आणि विधानसभेला खैरे असे समीकरण बनले होते. हिंदू मतांच्या आधारावर मोरेश्वर सावे निवडून आले. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले तेव्हा त्याचा मी विरोध केला. शिवसेनाप्रमुखांना खरमरीत टीका करणारे एक अनावृत पत्र लिहिले. तेव्हा दोन दिवस खैरेंचा प्रचार थांबला होता. शेवटी मनोहर जोशी यांनी पक्षाच्या मुखपत्रात मला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले. तेव्हाच माझा शिवसेनेशी असलेला संबंध संपला.

पुढे महापालिकेत तीन वर्षे अपक्ष म्हणून काम केले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत चालणारी टक्केवारीची प्रथा सुरू केली होती. मी स्थायी समितीचा सदस्य असतानाही काही चालत नव्हते. तोपर्यंत कोणीही महापालिकेत टक्केवारी घेत नसे. शिवसेनेने टक्केवारी राज सुरू केले. त्या टक्केवारीचा आज भस्मासुर झाल्याचा पाहायला मिळतो. नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवली नाही. तसेच कोणत्या पक्षाचेही काम केले नाही. वसंतराव नाईक महाविद्यालयातील नोकरी केली. त्यातून सेवानिवृत्त झालो.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019