शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मी पाहिलेली निवडणूक....नोकरीची तमा न बाळगता प्रचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:30 IST

जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते.

देशभरात आणीबाणी लागू केल्यानंतर दडपशाही सुरू होती. त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशव्यापी मोहीम उघडली. जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते. १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 

जनता पक्षाकडून डॉ. बापूसाहेब काळदाते आणि काँग्रेसकडून अब्दुल अझीम औरंगाबाद लोकसभेसाठी उभे राहिले. जनता पक्षाचे शहराध्यक्ष शालिग्राम बसैये यांनी माझी सिडको-हडको विभागाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तेव्हा मी वसंतराव नाईक महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर नोकरी करत होतो. नोकरीची तमा न बाळगता प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. आणीबाणीतील दडपशाही, भ्रष्टाचार याविरोधात बापूसाहेब काळदाते, गोविंदभाई श्रॉफ, मधू लिमये आदींनी रान पेटवले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात लाट निर्माण झाली होती. या लाटेत काळदाते यांना मोठा विजय मिळाला. पुढे १९८४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही एस काँग्रेसकडून साहेबराव पाटील डोणगावकर, आय काँग्रेसकडून अब्दुल अझीम आणि हाजी मस्तान यांनी काढलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक व सुरक्षा महासंघाने उमेदवार दिला. यात मुस्लिम मताचे विभाजन झाल्यामुळे साहेबराव पाटील डोणगावकर निवडून आले. त्यांना जनता पक्षानेही पाठिंबा दिला होता.

पुढे शहरात शिवसेनेचे वारे वाहू लागले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दौरे सुरू झाले. शिवसैनिक पक्षवाढीसाठी अहोरात्र कष्ट घेत होते. यात प्रामुख्याने माझाही समावेश होता. आक्रमकपणे हिंदूंची बाजू मांडली जात होती. १९८८ साली पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. मात्र, काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी मिळून काळे यांना महापौर बनविले. शिवसेना नगरसेवक आक्रमक होते. त्यांची दहशत निर्माण झाली होती. त्यात सर्वात आघाडीवर मीच होतो. एक वर्ष होताच पुन्हा महापौरांच्या निवडणुका लागल्या. त्यात मोरेश्वर सावे हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी आरपीआयच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेत महापौरपद पटकावले. त्या निवडणुकीत आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले.

मोरेश्वर सावे वर्षभर महापौर होते. त्यानंतर महापौरपदाची संधी माझ्याकडे चालून आली होती. मात्र, सावे यांनी त्यासाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावे यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत होती. आपल्याकडे पैसे नव्हते. त्यातही विरोध पत्करून, धाडस दाखवून जी शिवसेना उभी केली. त्याच शिवसेनेत पदासाठी पैसे देण्यास ठाम नकार दर्शविला. त्यामुळे माझी संधी हुकली. प्रदीप जैस्वाल यांना महापौर बनविले. १९८९ साली मोरेश्वर सावे यांना शिवसेनेकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काहीही केलेले नव्हते. ‘आयत्या पिठावर भाकरी’ थापण्याचे काम त्यांनी केले.

तेव्हाच सावे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात गुप्त करार झाला होता. लोकसभेला सावे आणि विधानसभेला खैरे असे समीकरण बनले होते. हिंदू मतांच्या आधारावर मोरेश्वर सावे निवडून आले. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले तेव्हा त्याचा मी विरोध केला. शिवसेनाप्रमुखांना खरमरीत टीका करणारे एक अनावृत पत्र लिहिले. तेव्हा दोन दिवस खैरेंचा प्रचार थांबला होता. शेवटी मनोहर जोशी यांनी पक्षाच्या मुखपत्रात मला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले. तेव्हाच माझा शिवसेनेशी असलेला संबंध संपला.

पुढे महापालिकेत तीन वर्षे अपक्ष म्हणून काम केले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत चालणारी टक्केवारीची प्रथा सुरू केली होती. मी स्थायी समितीचा सदस्य असतानाही काही चालत नव्हते. तोपर्यंत कोणीही महापालिकेत टक्केवारी घेत नसे. शिवसेनेने टक्केवारी राज सुरू केले. त्या टक्केवारीचा आज भस्मासुर झाल्याचा पाहायला मिळतो. नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवली नाही. तसेच कोणत्या पक्षाचेही काम केले नाही. वसंतराव नाईक महाविद्यालयातील नोकरी केली. त्यातून सेवानिवृत्त झालो.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019