शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:11 IST

विद्यापीठ : महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज दाखल केले नसल्याचा दावा; विद्यार्थी, पालकांची धांदल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून चार जिल्ह्यांत सुरुवात झाली. या परीक्षेसाठी ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील परीक्षेला सुरुवात होईपर्यंत ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जनरेट करण्यात आले. अनेकांना विना हॉलतिकीट नंबरवर परीक्षा देण्याची मुभा दिली. त्याच वेळी आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना चार जिल्ह्यांतील २६८ होम सेंटरवर मंगळवारपासून सुरुवात झाली. पदवीच्या १८ अभ्यासक्रमांना ८४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यातील ८४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ७५ हजार ४९२ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट परीक्षा विभागाने परीक्षेला सुरुवात होण्याच्या मिनिटापर्यंत ऑनलाइन जनरेट केले. उर्वरित आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नसल्यामुळे संबंधितांचे हॉलतिकीट बनले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षाही देता आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. हा प्रकार परीक्षा विभागासह महाविद्यालयांची दिरंगाई आणि बेपर्वाईमुळे घडल्याचे महाविद्यालयातील प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हॉलतिकीट ऐवजी मिळाले नंबरविद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होईपर्यंत अनेक केंद्रांवर हॉलतिकीट मिळालेच नव्हते. त्याचवेळी परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन जनरेट करीत महाविद्यालयांच्या लाॅगिनमध्ये पाठविण्यात आले. मात्र, परीक्षेला सुरुवात होईपर्यंत हे हॉलतिकीट डाऊनलोड झालेच नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाने दिलेल्या परीक्षा क्रमांकावर ऐनवेळी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पोहोचले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.

१२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षेपासून रोखलेबी.एस्सी संगणकशास्त्र या विषयात प्रथम सत्राची परीक्षा देणाऱ्या १२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षेपासून रोखल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांची तातडीने पर्यायी व्यवस्था करून होम सेंटरवर परीक्षा घेतल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. तसेच या महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, चौकशी समिती नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्ज प्राप्त विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिलेपदवी प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या तरी महाविद्यालयांकडून आठ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठ परीक्षा विभागाकडे दाखल झाले नाहीत. १५ डिसेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट दिले असून, ते परीक्षा देत आहेत.-डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरexamपरीक्षाStudentविद्यार्थी