शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

होरपळलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विधानसभेसाठी जोर‘बैठका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:42 PM

शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता विकासकामे करूनच जनतेसमोर जावे लागणार हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आहे. शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत. विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापौरांनी बैठकांवर जोर दिला आहे. २ मे रोजी चार वेगवेगळ्या विभागांच्या मॅरेथॉन बैठका बोलावल्या आहेत.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची शहरी भागात मते मागताना यंदा बरीच दमछाक झाली. त्यावरून आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्यावर अजिबात लढता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. शहरातील मतदारांनी मागील ३० वर्षांमध्ये शिवसेना-भाजप युतीला भरभरून मते दिली. या तुलनेत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना काय दिले...? नऊ दिवसांनंतर पाणी, कचऱ्याचे डोंगर, खराब रस्ते, २०० पेक्षा अधिक वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. कधी हिंदुत्वाच्या तर कधी जातीय समीकरणाच्या आधारावर युतीने निवडणुका जिंकल्या. यंदा लोकसभा निवडणुकीत युतीचे कोणतेच कार्ड यशस्वी झाले नाही. मत मागायला गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना असंख्य प्रश्न विचारून नागरिकांनी भंडावून सोडले होते. युतीच्या नेत्यांनी यापूर्वी शहरात असे चित्र कधीच बघितले नव्हते.

लोकसभा निवडणुकीतून बोध घेतलेल्या युतीच्या नेत्यांना पुढील विधानसभा, मनपाच्या निवडणुका सोप्या वाटत नाहीत. समांतर जलवाहिनी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटार योजना, खराब रस्ते आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. समांतर जलवाहिनीसाठी कितीही पैसा लागू द्या, पण निर्णय घ्या, असे वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही मनपा पर्याय शोधू शकली नाही. आता राज्य शासनानेच यात मार्ग काढावा, असा आग्रह मनपा पदाधिकाऱ्यांतर्फे राज्य शासनाकडे धरण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आणखी १२५ कोटींचा निधी देतो असे जाहीर केले. 

मागील चार महिन्यांत मनपातील सत्ताधारी, प्रशासनाला रस्त्यांची साधी यादी तयार करता आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दोनदा स्थानिक भाजप नेत्यांसमोर यादीची आठवण करून दिल्यावरही मनपाला जाग आली नाही. २ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चार वेगवेगळ्या विभागांची बैठक घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित राहतील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त होत आहे.

प्रत्येक निर्णयात कोलदांडासत्ताधारी आणि प्रशासन ही एका वाहनाची दोन चाके समजल्या जातात. मागील वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर पाणी फेरण्याचे काम प्रशासनाने केले. पदाधिकाऱ्यांनी एखाद्या कामाची शिफारस केली एवढे मनात ठेवून ते कामच रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला. पाणीपट्टीतील वाढीव रक्कम कमी करा, असा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. त्यानंतरही प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019