शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:40 IST

महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये उंबरठे झिजवावे लागतात

औरंगाबाद : कोरोना संसर्गानंतर तर लग्न समारंभ अत्यंत छोटेखानी स्वरूपात उरकण्यावर भर देण्यात येत आहे. लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी प्रमाणपत्रावर वेळेवर सह्याच करीत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते. कायद्याच्या दृष्टीनेही हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांसह मनपाच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल करावा लागताे. शहरात महापालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत. लग्न कोणत्या झोनच्या हद्दीत झाले त्यावरून संबंधित झोनवर जबाबदारी निश्चित केलेली आहे. महापालिकेने लग्न प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महापालिकेच्या फक्त झोन ब कार्यालयात किमान १० दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. इतर वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान दीड ते दोन महिने नागरिकांना चकरा माराव्या लागतात.

कोणती कागदपत्रे आवश्यकजन्माचा दाखला, शाळेची टी.सी. लाइट बिल, फोन बिल, रेशनकार्ड, आधार, निवडणूक कार्ड, पाच पासपोर्ट फोटो, ४ बाय ६ आकाराचा मुलाचा-मुलीचा फोटो, ३ साक्षीदार, मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलेले प्रमाणपत्र.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल?फॉर्म भरल्यानंतर महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात विविध कागदपत्रांसह तो सादर करावा. २० दिवसात प्रमाणपत्र देणे संबंधित वॉर्ड कार्यालयाला बंधनकारक केले आहे.

६५ ते २१५ रुपये खर्चलग्न झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी ६५ रुपये, ३ ते ९ महिने लग्नाला झाल्यास ११५ रुपये, ९ महिन्यांपेक्षा जास्त अवधी असेल तर २१५ रुपये फी आकारली जाते.

एजंट हा प्रकार नाही...महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये एजंट हा प्रकार नाही. मात्र, वॉर्डातील संबंधित कर्मचाऱ्यांकडूनच दिरंगाई केली जाते. कागदपत्रांची तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष करावी लागते. अनेकदा संबंधित अधिकारीच उपलब्ध नसतात.

किमान दोन महिने लागतातमहापालिकेच्या नऊपैकी आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान २ महिने तरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागतात. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून आणखी वेळ लावण्यात येतो.

एक महिन्यापासून सॉफ्टवेअर बंदमहापालिकेचे जुने सॉफ्टवेअरच एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे महिनाभरात एकही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीमार्फत नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले खरे, पण ते अद्याप सुरू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका