शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लग्न करणे सोपे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:40 IST

महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये उंबरठे झिजवावे लागतात

औरंगाबाद : कोरोना संसर्गानंतर तर लग्न समारंभ अत्यंत छोटेखानी स्वरूपात उरकण्यावर भर देण्यात येत आहे. लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी प्रमाणपत्रावर वेळेवर सह्याच करीत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते. कायद्याच्या दृष्टीनेही हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांसह मनपाच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल करावा लागताे. शहरात महापालिकेची नऊ झोन कार्यालये आहेत. लग्न कोणत्या झोनच्या हद्दीत झाले त्यावरून संबंधित झोनवर जबाबदारी निश्चित केलेली आहे. महापालिकेने लग्न प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महापालिकेच्या फक्त झोन ब कार्यालयात किमान १० दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. इतर वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान दीड ते दोन महिने नागरिकांना चकरा माराव्या लागतात.

कोणती कागदपत्रे आवश्यकजन्माचा दाखला, शाळेची टी.सी. लाइट बिल, फोन बिल, रेशनकार्ड, आधार, निवडणूक कार्ड, पाच पासपोर्ट फोटो, ४ बाय ६ आकाराचा मुलाचा-मुलीचा फोटो, ३ साक्षीदार, मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलेले प्रमाणपत्र.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल?फॉर्म भरल्यानंतर महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात विविध कागदपत्रांसह तो सादर करावा. २० दिवसात प्रमाणपत्र देणे संबंधित वॉर्ड कार्यालयाला बंधनकारक केले आहे.

६५ ते २१५ रुपये खर्चलग्न झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी ६५ रुपये, ३ ते ९ महिने लग्नाला झाल्यास ११५ रुपये, ९ महिन्यांपेक्षा जास्त अवधी असेल तर २१५ रुपये फी आकारली जाते.

एजंट हा प्रकार नाही...महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये एजंट हा प्रकार नाही. मात्र, वॉर्डातील संबंधित कर्मचाऱ्यांकडूनच दिरंगाई केली जाते. कागदपत्रांची तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष करावी लागते. अनेकदा संबंधित अधिकारीच उपलब्ध नसतात.

किमान दोन महिने लागतातमहापालिकेच्या नऊपैकी आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये किमान २ महिने तरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागतात. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून आणखी वेळ लावण्यात येतो.

एक महिन्यापासून सॉफ्टवेअर बंदमहापालिकेचे जुने सॉफ्टवेअरच एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे महिनाभरात एकही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीमार्फत नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले खरे, पण ते अद्याप सुरू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका