शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

‘डिस्लेक्सिया’ असलेल्या विद्यार्थ्यास औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे मिळाला दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:09 IST

अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया) असलेल्या जळगाव येथील सिद्धांत मानुधने या दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला. 

ठळक मुद्देजळगाव येथील सिद्धांत पंकज मानुधने (१७) हा दहावीतील विद्यार्थी डिस्लेक्सियाग्रस्त आहे.तो जळगावमधील काशीनाथ पठाडे पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतो. ही शाळा ‘सीबीएसई’शी संलग्न आहे. डिस्लेक्सियाग्रस्तांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी ‘सीबीएसई’ बोर्डाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून दहावीच्या परीक्षेत तिसर्‍या भाषेची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.

औरंगाबाद :  अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया) असलेल्या जळगाव येथील सिद्धांत मानुधने या दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला. 

न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने सिद्धांतला परीक्षेला  लेखनिकाची मदत देण्याचा आदेश दिला. त्याने इयत्ता नववीमध्ये निवडलेल्या पाच विषयांच्या परीक्षेला त्याला बसू द्यावे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार्‍या ‘तांत्रिक’ विषयांच्या परीक्षेसाठी सिद्धांतकरिता विशेष व्यवस्था करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

जळगाव येथील सिद्धांत पंकज मानुधने (१७) हा दहावीतील विद्यार्थी डिस्लेक्सियाग्रस्त आहे. तो जळगावमधील काशीनाथ पठाडे पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतो. ही शाळा ‘सीबीएसई’शी संलग्न आहे. अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया), लिखाणातील अक्षमता (डिस्ग्राफिया) आणि गणितीय अक्षमता (डिस्कॅल्कुलिया) अशा विषयांबाबत अडचणी असलेल्या (मिरर इमेज म्हणजे उलट-सुलट अक्षरे दिसणे) विद्यार्थ्यांसाठी  वेगळे नियम असून, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी ‘सीबीएसई’ बोर्डाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून दहावीच्या परीक्षेत तिसर्‍या भाषेची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.

परिपत्रकातील अनेक विषयांमधून कोणतेही चार विषय निवडण्याची त्याचप्रमाणे नववीमध्ये घेतलेलेच विषय दहावीतही घेण्याची सवलत दिली होती. त्यानंतर शासनाने २४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये विषयांची सवलत कमी केली आणि १७ आॅक्टोबर २०१७ च्या परिपत्रकान्वये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद केले. आधीच्या यादीतील ४६१ ते ४६७ बंद करून यापैकी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ४०१ ते ४०७ क्रमांकामधील विषय निवडण्याचे कळविले. परीक्षा चार महिन्यांवर आल्यामुळे नवीन विषयाचा अभ्यास करणे शक्य नव्हते. तसेच त्याची दोन विषयांची परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी घेण्यात येणार होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रश्मी कुलकर्णी हरदास, केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल  संजीव देशपांडे तर शाळेतर्फे अ‍ॅड. स्वप्नील पातनुरकर यांनी काम पाहिले. 

‘ऐनवेळी ते शक्य नाही’याचिकाकर्त्याने नववीतील विषयांचीच परीक्षा दहावीतही देऊ द्यावी किंवा आयटीशी संबंधित दोन्ही विषयांची परीक्षा देऊ द्यावी, अशी विनंती केली. ऐनवेळी विषय बदलून त्यांची परीक्षा देणे हे त्याची मानसिक स्थिती पाहता शक्य नाही, असे सुनावणीच्या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीHigh Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा