शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

‘डिस्लेक्सिया’ असलेल्या विद्यार्थ्यास औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे मिळाला दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:09 IST

अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया) असलेल्या जळगाव येथील सिद्धांत मानुधने या दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला. 

ठळक मुद्देजळगाव येथील सिद्धांत पंकज मानुधने (१७) हा दहावीतील विद्यार्थी डिस्लेक्सियाग्रस्त आहे.तो जळगावमधील काशीनाथ पठाडे पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतो. ही शाळा ‘सीबीएसई’शी संलग्न आहे. डिस्लेक्सियाग्रस्तांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी ‘सीबीएसई’ बोर्डाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून दहावीच्या परीक्षेत तिसर्‍या भाषेची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.

औरंगाबाद :  अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया) असलेल्या जळगाव येथील सिद्धांत मानुधने या दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला. 

न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने सिद्धांतला परीक्षेला  लेखनिकाची मदत देण्याचा आदेश दिला. त्याने इयत्ता नववीमध्ये निवडलेल्या पाच विषयांच्या परीक्षेला त्याला बसू द्यावे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार्‍या ‘तांत्रिक’ विषयांच्या परीक्षेसाठी सिद्धांतकरिता विशेष व्यवस्था करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

जळगाव येथील सिद्धांत पंकज मानुधने (१७) हा दहावीतील विद्यार्थी डिस्लेक्सियाग्रस्त आहे. तो जळगावमधील काशीनाथ पठाडे पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतो. ही शाळा ‘सीबीएसई’शी संलग्न आहे. अध्ययन अक्षमता (डिस्लेक्सिया), लिखाणातील अक्षमता (डिस्ग्राफिया) आणि गणितीय अक्षमता (डिस्कॅल्कुलिया) अशा विषयांबाबत अडचणी असलेल्या (मिरर इमेज म्हणजे उलट-सुलट अक्षरे दिसणे) विद्यार्थ्यांसाठी  वेगळे नियम असून, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी ‘सीबीएसई’ बोर्डाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून दहावीच्या परीक्षेत तिसर्‍या भाषेची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले.

परिपत्रकातील अनेक विषयांमधून कोणतेही चार विषय निवडण्याची त्याचप्रमाणे नववीमध्ये घेतलेलेच विषय दहावीतही घेण्याची सवलत दिली होती. त्यानंतर शासनाने २४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये विषयांची सवलत कमी केली आणि १७ आॅक्टोबर २०१७ च्या परिपत्रकान्वये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद केले. आधीच्या यादीतील ४६१ ते ४६७ बंद करून यापैकी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ४०१ ते ४०७ क्रमांकामधील विषय निवडण्याचे कळविले. परीक्षा चार महिन्यांवर आल्यामुळे नवीन विषयाचा अभ्यास करणे शक्य नव्हते. तसेच त्याची दोन विषयांची परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी घेण्यात येणार होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रश्मी कुलकर्णी हरदास, केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल  संजीव देशपांडे तर शाळेतर्फे अ‍ॅड. स्वप्नील पातनुरकर यांनी काम पाहिले. 

‘ऐनवेळी ते शक्य नाही’याचिकाकर्त्याने नववीतील विषयांचीच परीक्षा दहावीतही देऊ द्यावी किंवा आयटीशी संबंधित दोन्ही विषयांची परीक्षा देऊ द्यावी, अशी विनंती केली. ऐनवेळी विषय बदलून त्यांची परीक्षा देणे हे त्याची मानसिक स्थिती पाहता शक्य नाही, असे सुनावणीच्या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीHigh Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा