शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अन्न-पाण्याविना बिबट्याचा तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:02 IST

अन्न-पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा डोंगरात तब्बल पाच दिवसांपासून बिबट्याचा मृतदेह पडून होता. एका गुराख्याने वन विभागास माहिती दिल्याने ही गंभीर घटना समोर आली. शुक्रवारी जागेवरच शवविच्छेदन करून बिबट्यावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले.

सिल्लोड : अन्न-पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा डोंगरात तब्बल पाच दिवसांपासून बिबट्याचा मृतदेह पडून होता. एका गुराख्याने वन विभागास माहिती दिल्याने ही गंभीर घटना समोर आली. शुक्रवारी जागेवरच शवविच्छेदन करून बिबट्यावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले.शिरसाळा गावापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या खोल दरीत गुरुवारी सायंकाळी बिबट्याचा मृतदेह पडलेला एका गुराख्याला दिसला. त्याने गुरुवारीच सोयगाव वन विभागास माहिती दिली, पण तेथील काही कर्मचारी जळगाव, तर काही औरंगाबाद येथे राहत असल्याने याची माहिती गुरुवारी लपविण्यात आली.सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. दहीवाल, अजिंठ्याचे मागधरे, सोयगावचे शिवाजी काळे, वनपाल, वनरक्षक आदींनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.सोयगावचा वनविभाग निष्काळजीशिरसाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येत असले तरी वन विभागाची हद्द सोयगाव आहे. सर्व गैरसोयींनी ‘नटलेल्या’ सोयगावातील अधिकारी, कर्मचारी औरंगाबाद, जळगाव येथून अपडाऊन करतात. जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही, सर्व पाणवठे कोरडे पडले आहेत. कागदावरील पाणवठ्यात पाणी सोडले जाते. डोंगरात वृक्षतोड वाढली आहे. ५ दिवसांपूर्वी डोंगरात मरून पडलेला बिबट्या वन कर्मचाºयांना कसा दिसला नाही, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यावरून सोयगावचा वन विभाग किती निष्काळजी आहे, हे दिसून येते.ंअन्नपाणी न मिळाल्यानेच बिबट्या गतप्राणपाच-सहा दिवस झाल्याने बिबट्याचा मृतदेह कुजला होता. त्याची चामडी गळून पडत होती. पोटात अन्न व पाणी नव्हते. त्यामुळे हा भूकबळीचाच प्रकार आहे, अशी माहिती शवविच्छेदन करणारे घाटनांद्रा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाजन यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघ