सा़बां़ विभागाचा गोंधळ
By Admin | Updated: May 13, 2014 01:04 IST2014-05-13T00:02:07+5:302014-05-13T01:04:11+5:30
भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्यांची संख्या वाढली आहे़

सा़बां़ विभागाचा गोंधळ
भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्यांची संख्या वाढली आहे़ पण कामे सुरू होण्यापूर्वीच टक्केवारी चालू झाली असल्याने ही कामे किती चांगली होतील, याबाबत शंका निर्माण होत आहे़ सा़ बां़ च्या या सावळ्या गोंधळाकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे़ भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत़ या विभागाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तक्रार करू नये म्हणून तालुक्यातील काही कार्यकर्त्यांना सा़ बां़ विभाग छोटमोठे कामे देतो़ तर काही गुत्तेदार टेंडरप्रमाणे ही कामे घेतात़ कार्यकर्त्यांकडे कामे करण्याची कोणतीच तयारी नसल्याने ती कामे तब्बल ५ ते ७ टक्के घेवून ही कामे विकली जातात़ तर काही गुत्तेदारांकडे कामाचा बोजा वाढल्याने आपल्याला मिळालेली कामे दुसर्या गुत्तेदाराला देत वरच्या वर मलई खाण्याचे काम करतात़ ज्या गुत्तेदाराकडे कसलाच वशिला नाही, ते गुत्तेदार ही कामे विकत घेवून काम सुरू होण्यापूर्वीच टक्केवारी देत आहेत़ कामाच्या सुरुवातीपासूनच टक्केवारी सुरू झाल्याने या कामात किती सच्चेपणा असेल हे समजणारे कोडं आहे़ सदरील कामे परस्पर विकून मलई खाणार्यांची संख्या तालुक्यात वाढली आहे़ या बाबीकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ खड्डे बुजले पण... पावसाळा संपताच भोकरला जोडणार्या सर्व रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविले़ पण सद्य:स्थितीत आता हे रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत़ भोकर, उमीर व भोकर-तामसा हा रस्ता तर खड्डेमय झाला असल्याने वाहने चालविणे अवघड झाले आहे़ उद्योग बंद झालेच नाहीत मागील एका वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे एका विकासकामाच्या भूमिपूजनाच्या वेळी म्हणाले होते की, निधी कमी पडणार नाही, पण कामे दर्जेदार झाली पाहिजेत़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ अन्यथा काम एकाने घ्यायचे, दुसर्याला द्यायचे आणि तिसर्याने करायचे, हे उद्योगधंदे बंद करा़ अशोकराव चव्हाण यांच्या या सूचनेकडे सा़बां़ विभाग मात्र चक्क दुर्लक्ष करीत हे उद्योगधंदे चालूच ठेवले आहेत़